Gram Panchayat Eletion results : राज्यातील २ हजार ३५९ ग्रामपंचायतींचे निकाल आज जाहीर होत आहे. आतापर्यंत भाजपने सर्वाधिक जागा जिंकल्याचे दिसत आहे. मात्र हा दावा फेटाळून लावत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. भाजपने विजयी ग्रामपंचायतींची यादी जाहीर करावी, त्यांचे मूळ असलेल्या ठिकाणीच त्यांचा सुपडासाफ झालेला आहे, असा दावा नाना पटोले यांनी केला आहे.
पत्रकार परिषदेमध्ये नाना पटोले म्हणाले की, “भाजप हा खोटारडा पक्ष आहे. ते खोटं बोलून सत्तेत आलेले आहेत. मुळात ग्रामपंचायत निवडणुकीत पक्ष नसतोच. तरीही भाजपचं मूळ असलेल्या नागपूरमध्ये भाजपचा सुपडासाफ झालेला आहे.”
“भाजपने विजयी ग्रामपंचायतींची यादी जाहीर करावी. तेव्हाच कळेल कुठल्या ग्रामपंचायती कुणी जिंकल्या. खोटं बोलतील तर लोक त्यांना मारतील. विशेष म्हणजे ओबीसी आरक्षणाशिवाय या निवडणुका झालेल्या आहेत. हिंमत असेल तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घ्याव्यात,” असे आव्हान पटोलेंनी नाना दिले आहे.
दरम्यान, आतापर्यंत भाजपने- ३७, शिवसेना (शिंदे)- १६२, राष्ट्रवादी (अजित पवार)- २२१, शिवसेना (ठाकरे) – ५९, शरद पवार गट- ६९ आणि काँग्रेस- ८७ या जागांवर विजयी झाले आहे. तर दक्षिण सोलापूर तालुक्याचे लक्ष लागलेल्या कासेगाव ग्रामपंचायतीवर भाजपची सत्ता आली आहे. नागपूर- कामठी तालुक्यातील नेरी ग्रामपंचायतीतही भाजपचा विजय झाला आहे.