मुंबई – भाजप आमदार चंद्रकांत पाटील यांनी नुकतंच एक वादग्रस्त विधान केलं, “कर्मवीर भाऊराव पाटील, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेबांनी शाळा उघडण्याकरिता लोकांकडे भीक मागितली…’ असं ते म्हणाले असून, त्यांच्या या विधानंतर राजकीय वातावरण चांगलंच तापल्याचं दिसून येत आहे. मात्र, त्यानंतर चंद्रकांत पाटील यांनी आपल्या विधानावरून यू-टर्न घेत दिलगिरी देखील व्यक्त केली होती.
मात्र, त्यानंतर देखील काही जणांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक करत त्यांच्या विधानाचा निषेध नोंदवला होता. आणि हे प्रकरण आणखीच तापल्याचं पाहायला मिळालं. मात्र, भाजपने देखील आक्रमक भूमिका घेत राज्यातील अनेक शहरांमध्ये निषेध आंदोलन केलं. दरम्यान, नुकतंच अमरावती शहर भाजपातर्फे राजकमल चौकात चंद्रकात पाटील यांच्या समर्थनार्थ व शाईफेकीच्या घटनेचा निषेध करण्याकरता आला होता. यावेळी मोठ्या संख्येनं भाजप कार्यकर्ते उपस्थित होते.
#Newsinshort
कहना क्या चाहते थें… सत्तेत असलेल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी दिल्या सरकारविरोधात घोषणा.. पाहावे ते नवलच#म #मराठी #अमरावती pic.twitter.com/ZLDAKO8t2B— Pratiksha Bansode (@pratikshapb) December 13, 2022
मात्र, आंदोलनावेळी भाजपच्या अतिउत्साही कार्यकर्त्यांनी ओघाच्या भरात सरकार विरोधातच घोषणाबाजी केली असल्याचं पाहायला मिळालं आहे. सध्या या आंदोलनाचा एक व्हिडिओ देखील सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून, अनेकांनी यावर आपल्या प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे. या आंदोलनाकरीता अमरावती शहरातील शहर अध्यक्ष, भाजप प्रवक्ते व सर्व माजी नगरसेवक आणि ईस्टर कार्यकर्ते आंदोलनासाठी जमले होते.
त्यावेळी भाजपच्या माजी नगरसेविका सुरेखा लुंगारे यांनी “या सरकारचे करायच काय…” असा नारा दिला. यावेळी बाकीचांनी लगेचच ‘खाली डोके वरती पाय…’ असे म्हटले. मात्र ही चूक लगेचच लक्षात आल्याने इतर भाजप पदाधिकाऱ्यांनी सारवासारव केल्याचं पाहायला मिळालं. तसेच दुसऱ्या घोषणा देण्यास सुरुवात केली. यावेळी आंदोलनात एकच गोंधळ झाल्याचं दिसून आलं.
चंद्रकांत पाटील यांचं वादग्रस्त व्यक्तव्य….
पैठणमधील एका कार्यक्रमात चंद्रकांत पाटील म्हणाले, देशात शाळा कोणी सुरू केल्या, कर्मवीर भाऊराव पाटलांनी सुरू केल्या. महात्मा ज्योतिराव फुलेंनी केल्या. या सगळ्या शाळा सुरू करताना सरकारने त्यांना अनुदान नाही दिले. त्यांनी लोकांकडे भीक मागितली. शाळा सुरू करायची आहे, मला पैसे द्या. त्या काळात 10 रुपये देणारे होते. आता 10-10 कोटी रुपये देणारी लोक आहेत, असे विधान त्यांनी केले.