मुंबई – मशिदींवरील भोंग्यांच्या मुद्दावर राज ठाकरे यांनी आक्रमक पावित्रा घेत 4 मेपासून आपला कार्यक्रम हाती घेतला जाणार असल्याचा इशारा दिला. त्यामुळे राज्याचं राजकारण ढवळून निघालं आहे. आता राज ठाकरे यांनी केलेल्या भडकाऊ भाषणानंतर त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले असून त्यांच्या अटकेच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. यावर आता राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांनी टीका केली आहे.
भुजबळ यांनी नारायण राणे, राणा दाम्पत्य आणि राज ठाकरे यांच्यावर टीका केली. भाजपने तीन राणे, राणा आणि राज असे तीन RRR जुळवलेले दिसत आहेत. तसेच जो कायद्याचं उल्लंघन करेल, त्याच्यावर कारवाई होणारच, असंही भुजबळ म्हणाले.
भुजबळ म्हणाले यांनी, राणा दाम्पत्य, राज ठाकरे आणि राणे पिता पुत्रांना छगन भुजबळ यांनी दाक्षिणेचा सुपर डुपर हिट चित्रपट RRR ची उपमा दिली. ठाकरे सरकार उत्तम काम करत आहे. मात्र महाविकास आघाडी सरकारविरोधात भाजपने या तीन RRR चा उपयोग सुरु केलाय, असा टोला त्यांनी लगावला.
यावेळी भुजबळ यांनी राज ठाकरे यांनी महाराष्ट्राला आग लावू नका. केवळ उद्ध्व ठाकरेंना अडचणीत आणण्यासाठी दंगे माजवण्याचे काम करू नका”, असं आवाहनही भुजबळ यांनी राज यांना केलं.