मुंबई – कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजपवर पुन्हा एकदा निशाणा साधला आहे. भाजपच्या हातून सत्ता गेल्यानंतर भाजपची काळी नजर महाविकास आघाडी सरकारवर आहे. मात्र भाजपची काळी जादू चालणार नसून हे सरकार 5 वर्ष पूर्ण करेल, असं म्हणत पटोले यांनी भाजपवर निशाणा साधला.
दरम्यान, भंडारा जिल्ह्याच्या सायकल परेड कार्यक्रमात बोलतांना ते म्हणाले,’भाजप पक्षातील नेते सतत आरोप करत आहे की, सरकार राष्ट्रावादी चालवत असून काँग्रेस -शिवसेना फक्त बघाची भूमिका घेत आहे, मात्र मुळात भाजपची पहाटे आलेले सरकार गेल्याने भाजपची तडफडत होत आहे’
ते पुढे म्हणाले, मविआ सरकार कॉमन मिनिमम प्रोग्रामवर काम करत आहे. ह्याचाच त्रास विरोधकास होत आहे. भाजपची काळी नजर आहे. त्यामुळे भाजप ची काळी जादू चालणार नसून ही सत्ता 5 वर्ष चालेल.’ असं म्हणत पटोले यांनी भाजप पक्षावर टीका केली.