राज्यमंत्री अब्दुल सत्तार : कोंढव्यात रक्तदान, नेत्रतपासणी शिबिर
कोंढवा – “महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हिंदुत्ववादी आहेत, मात्र त्यांनी कधीही मुस्लीम बांधवांवर अन्याय केलेला नाही. महाविकास आघाडीचे सरकार सर्वांना न्याय देत आहे. औरंगाबादचे नाव संभाजीनगर करण्याबाबत शिवसेनेची भूमिका स्पष्ट आहे. त्यावर मित्रपक्ष एकत्रित तोडगा काढतील. भाजपने पवित्र भगवद्गीता आणि कुराणाचे वाचन करायला हवे, असे मत राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी कोंढवा खुर्द येथे व्यक्त केले.
जमियत उलमा संघटनेच्यावतीने रक्तदान व नेत्र तपासणी, चिकित्सा शिबिराचे आयोजन संघटनेचे अध्यक्ष कारी मोहम्मद इदरीस, आफिस सोहब अन्सारी यांनी केले होते. त्यावेळी सत्तार बोलत होते. आई प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रसाद महादेव बाबर यांच्यावतीने रक्तदात्यास भगवद्गीता आणि कुराण भेट देण्यात आले.
यावेळी आमदार चेतन तुपे-पाटील, माजी आमदार महादेव बाबर, हाजी इब्राहिम शेख, फारुख इनामदार, राकेश कामठे, रशीद शेख, उस्मान तांबोळी, नगरसेवक गफूरभाई पठाण, साईनाथ बाबर, तानाजी लोणकर, हाजी फिरोज शेख, रईस सुंडके, युसूफ जकाती, संजय कांबळे, राजेंद्र बाबर, मोहसिन शेख, राहुल लोणकर, अनिल जगताप यांच्यासह परिसरातील नागरिक व ग्रामस्थ उपस्थित होते.