मुंबई : भारतीय जनता पक्षाचे आमदार आणि उद्योजक प्रसाद लाड यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना एक पत्र लिहिले आहे. या पत्रात त्यांनी आपल्या जीवाला धोका असल्याचे म्हटले आहे.
मुख्यमंत्र्यांसोबतच लाड यांनी मुंबई पोलीस आयुक्तांना पत्र पाठवून आपल्या जीवाला धोका असल्याचे सांगितले.
अनोळखी व्यक्तीकडून पळत ठेवली जात असल्याचा दावा प्रसाद लाड यांनी पत्रात केला आहे.
प्रसाद लाड यांनी गायकवाड नामक व्यक्ती वेगवेगळ्या मार्गाने जीवे मारण्याच्या प्रयत्नात असल्याचे पत्रात नमूद केले आहे.