मुंबई -महाराष्ट्रात मुंबईमध्ये पुढील काही दिवसात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. मुंबईत येत्या शुक्रवारपर्यंत ऑरेंज अलर्टही जारी करण्यात आला आहे. येत्या ५ दिवसांत मुंबई आणि ठाण्यात मुसळधार पावसाची शक्यता असल्याचे आयएमडीने आपल्या अंदाजात म्हटले आहे. हवामान खात्याच्या इशाऱ्याच्या पार्श्वभूमीवर एनडीआरएफची टीम मुंबईत आपत्ती टाळण्यासाठी आधीच तैनात करण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रशासनाला याप्रकरणी सतर्क राहून प्रतिबंधात्मक उपाययोजनांवर लक्ष ठेवण्यास सांगितले आहे.
अखेर अडीच वर्षानंतर घराबाहेर पडणारा, मैदानात उतरणारा मुख्यमंत्री महाराष्ट्राला मिळाला… https://t.co/Av7ViBp8lq
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) July 6, 2022
तर अशातच मुंबईतील पावसाची स्थिती आणि त्यासंदर्भात कराव्या लागणाऱ्या उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी खुद्द मुख्यमंत्री आता रस्त्यावर उतरले आहेत. यावरून भाजप नेते अतुल भातखळकर यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत एक ट्विट करत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर खोचक टीका केली आहे. तत्पूर्वी, “नाल्यातले पैसे खाल्ले, कचऱ्यातले खाल्ले , मुंबईला तुंबवून दाखवलं” असं म्हणत ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल केला होता.
काय आहे अतुल भातखळकर यांचे ट्विट
नाल्यातले पैसे खाल्ले, कचऱ्यातले खाल्ले , मुंबईला तुंबवून दाखवलं…
आता शिवसेनेने @mybmc तून देखील तोंड काळे करण्याची तयारी ठेवावी… https://t.co/SCiP9ecryh
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) July 5, 2022