यशवंतनगर, (वार्ताहर) – शेतकर्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार विविध योजना राबवत आहे. या योजनांची माहिती शेतकर्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी भाजप किसान मोर्चाच्यावतीने सुरू झालेल्या ‘ग्राम परिक्रमा’ अभियानाची सांगता उद्या, दि. 13 रोजी सायंकाळी 6 वाजता बेलवाडी, ता. कराड येथे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत होणार असल्याची माहिती किसान मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस रामकृष्ण वेताळ यांनी दिली.
या कार्यक्रमास खासदार उदयनराजे भोसले, आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, आमदार जयकुमार गोरे, भाजप प्रदेश कार्यकारणी सदस्य डॉ. अतुल भोसले, किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष गणेश भेगडे, भाजप प्रदेश उपाध्यक्ष विक्रम पावसकर, जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम, कराड उत्तर विधानसभा मतदारसंघ निवडणूक प्रमुख मनोज घोरपडे, प्रदेश कार्यकारिणी सदस्य भरत पाटील उपस्थित राहणार आहेत.
जय हनुमान करिअर अॅकॅडमी (तारगाव रोड) येथे होणार्या या कार्यक्रमाचे आयोजन रामकृष्ण वेताळ यांनी केले आहे. यावेळी पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व शेतकर्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.