मुंबई – हिंदवी स्वराज्य आणि हिंदूवी स्वराज्य या शब्दाचा अर्थ भाजपला कळत नाहीय असे बोलून भाजप छत्रपती शिवाजी महाराजांचे व्यक्तिमत्त्व कमी करण्याचा खेळ खेळत आहेत, असा आरोप राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केला आहे.
हिंदवी स्वराज्य आणि हिंदूवी या शब्दाचा अर्थ भाजपच्या लोकांनी शब्दकोशात तपासून पहावा, असेही नवाब मलिक म्हणाले.
हिंदूवी या शब्दाचा खेळ भाजपने खेळू नये. छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यात मदारी मेहत्तर तोफखान्याचे सरदार होते व इतर प्रमुख दलाचे लोक होते. छत्रपती शिवाजी महाराजांनी धर्माच्या आधारावर कधीही राजकारण केलेले नाही. मात्र भाजपचे लोक चुकीचा इतिहास काही लोकांना पुढे करून या देशाचा इतिहास बदलून छत्रपती शिवाजी महाराजांच्याबाबतीत गैरसमज निर्माण करत आहेत, अशी टीका नवाब मलिक यांनी व्यक्त केले.