मुंबई : राज्यातील विधानसभा निवडणुकांचे निकाल लागून बारा दिवस उलटून गेले तरी देखील अद्याप सत्तास्थापनेबाबत कुठलाही ठोस निर्णय झालेला नाही. भज आणि शिवसेना यांच्यात मुख्यमंत्री पदावरून रस्सी खेच सुरु आहे. त्या अनुषंगाने आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजप नेत्यांची तातडीची बैठक बोलावली होती. या बैठकी नंतर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी महायुतीचंच सरकार स्थापन होईल असा विश्वास व्यक्त केला आहे.
सोमवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची दिल्लीत भेट घेतली होती. त्यानंतर फडणवीस यांनी महायुतीचा उल्लेख करणे टाळले असल्याने चर्चाना उधाण आले होते. त्यामुळे आज बोलावलेल्या बैठकीला विशेष महत्व प्राप्त झाले आहे. या बैठकीत नेमकं काय चर्चा झाली याची सर्वानाच उत्सुकता लागली आहे.
Chandrakant Patil, BJP Maharashtra President after party meeting: People have given mandate to BJP-Shiv Sena alliance,we’ll honour that mandate & form govt. Shiv Sena is yet to give any proposal. BJP’s doors are always open for Shiv Sena. https://t.co/22hb25VeWE pic.twitter.com/T5Upqia3Y2
— ANI (@ANI) November 5, 2019
या बैठकी नंतर चंद्रकांत पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला असता ते म्हणाले, “शिवसेनेच्या प्रस्तावासाठी भाजपची दारे २४ तास उघडी आहेत. तसेच महाराष्ट्रामध्ये भाजपा आणि शिवसेना महायुतीचंच सरकार स्थापन होईल आणि देवेंद्र फडणवीस हेच पुन्हा एकदा मुख्यमंत्री बनतील”. त्यामुळे शिवसेनेने घेतलेल्या ताठर भूमिकेमुळे राज्यात निर्माण झालेला सत्तास्थापनेचा तिढा आता सुटण्याची चिन्हे दिसू लागली आहेत