मुंबई – मुंबईत क्रूझवर चाललेल्या ड्रग्ज पार्टीतून अटक केलेल्या अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याच्यासह अरबाज सेठ मर्चंट आणि मुनमुन धामेचा यांना ७ ऑक्टोबरपर्यंत एनसीबी कस्टडी सुनावण्यात आली आहे. आता या प्रकरणावरून राजकारण तापलं आहे. राष्ट्रवादीकडून या प्रकरणाशी भाजप कनेक्शन असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
एनसीबीने क्रूझवर छापा मारलाच नव्हता. भाजपच्या एका उपाध्यक्षानेच ही कारवाई केली आहे. भाजपच्या कार्यकर्त्याने कोणत्या अधिकारात ही कारवाई केली ? एनसीबीही भाजपची शाखा झाली आहे का ?, असा सवाल राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि मंत्री नवाब मलिक यांनी केला आहे. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.
एनसीबीनं कारवाई केली, त्या कारवाईत एक व्यक्ती आर्यन खानला घेऊ जात आहे. त्याच्याबरोबर सेल्फी काढण्यात आला. सेल्फी व्हायरला झाला. त्यातील व्यक्ती एनसीबीचा अधिकार नाही, असा दावा मलिक यांनी केला आहे. तो व्यक्ती एनसीबीचा नाही असं सांगण्यात आलं. मग हा व्यक्ती नक्की कोण ? असा सवाल त्यांनी केला आहे.
मलिक म्हणाले की, एनसीबीने क्रूझवर कारवाई केलीच नाही. मनिष भानुशाली या व्यक्तीने आर्यन खानला ताब्यात घेतलं होतं. भानुशाली हा भाजपचा उपाध्यक्ष आहे. त्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा, जेपी नड्डा, देवेंद्र फडणवीस आणि आशिष शेलारांसोबतही फोटो आहेत. भाजपच्या कार्यकर्त्यांना अशा प्रकारची कारवाई करण्याचा अधिकार कुणी दिला ? असा सवाल मलिक यांनी केला आहे. तसेच गुजरातमधील ड्रग्ज प्रकरणाशी मनिष भानुशालीचा काही संबध आहे का, असा सवालही मलिक यांनी उपस्थित केला आहे.