नवी दिल्ली – हॉलिवूड सिंगर रिहानाने दिल्लीतील शेतकरी आंदोलनावर ट्विट केल्यानंतर कंगना राणावतने लागलीच आपला मोर्चा रिहानाकडे वळवला. रिहानाचे ट्विटनंतर कंगनाने लांबलचक पोस्ट लिहित उत्तर दिले. या दोघांच्या वादात पंजाबी गायक व अभिनेता दिलजीत दोसांज उडी घेत रिहानासाठी एक गाणं तयार केलं. यामुळे भडकलेल्या कंगनाने दिलजीतला खलिस्तानी संबोधले. सध्या ट्विटरवर शेतकऱ्यांना पाठिंबा देणाऱ्या गटामध्ये आणि मोदी सरकारला पाठिंबा देणाऱ्यामध्ये चांगला वाद सुरु आहे. हा वाद सुरूच असतांना याच संदर्भात महानायक अमिताभ बच्चन यांनी एक ट्विट केलं आहे. मात्र त्यांच्या ट्विटमुळे नेटकऱ्यांनी त्यांना चांगलेच ट्रोल केल्याचे दिसून येत आहे.
T 3803 –
“तर्क का जवाब तो तर्क में दिया जा सकता है
पर विश्वास का जवाब तर्क के पास नहीं है। ” ~ Ef ViBayou can give an answer to an argument with an argument ;
but an answer to trust does not lie with argument— Amitabh Bachchan (@SrBachchan) February 3, 2021
अमिताभ बच्चन यांचं हे ट्विट प्रत्यक्षपणे शेतकरी आंदोलनासाठी नसलं तरी सध्या सुरू असलेल्या परिस्थितीवर बेतलं आहे. त्यामुळं नेटकऱ्यांनी तुमचा पाठिंबा नक्की कोणाला आहे?, हे स्पष्ट करा असं म्हटलं आहे.
त्यांनी ट्विट केले आहे की,’अमिताभ यांनी ‘तर्क का जवाब तो तर्क में दिया जा सकता है ,पर विश्वास का जवाब तर्क के पास नहीं है’, असं ट्विट अमिताभ यांनी केलं आहे. त्यानंतर नेटकऱ्यांनी अमिताभ यांना ट्रोल करण्यास सुरुवात केली. आणि बिग बी तुमचा पाठिंबा कुणाला असं म्हणत त्यांचा ट्विटवर प्रश्न उपस्थित केले आहे.