राजगुरुनगर -निसर्ग चक्रीवादळामुळे अनेक विजेचे खांब पडल्याने भोरगिरी (ता. खेड) हे आदिवासी गाव गेली दहा दिवस विजेअभावी अंधारात आहे. निसर्ग चक्री वादळात भोरगिरी गावातील विजेचे पाच खांब वादळात पडले आहे. तेव्हापासून भोरगिरी आणि येळवळी ही दोन गावे अंधारात गेले आहेत. वीज नसल्याने या गावांत ग्रामस्थांची खूपच गैरसोय होत आहे.
दळण, पिण्याचे पाणी या समस्या निर्माण झाल्या आहे. वीज नसल्याने मोबाइल चार्जिंग करता येत नाहीत. टीव्ही चालत नाही. गावातील दळणवळणाच्या प्रश्न निर्माण झाला आहे. पदाधिकारी व वीज अधिकाऱ्यांना वारंवार सांगूनही त्यांच्याकडून काही हालचाल झालेली नाही.
भोरगिरीत पाऊस सुरू झाला आहे. जोराचा पाऊस सुरू झाल्यास चिखलात खांब उभे करणे अवघड होईल. तरी दोन दिवसांत हे काम पूर्ण करावे, अशी ग्रामस्थांची मागणी आहे.
सध्या लोखंडी खांबांचा तुटवडा आहे. खांब मागितले आहेत. खांब आल्यावर प्राधान्याने हे काम पूर्ण करू.- मनीष कडू,
उपविभागीय अभियंता