मुंबई : शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे हे नॉट रिचेबल झाल्यापासून राज्य सरकारवरच संकट जास्तच गडद झाल्याचे दिसून येत आहे. एकनाथ शिंदे नॉट रिचेबल असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सर्वत्र सुरु आहेच. पण यानिमित्ताने भाजपचे नेते सेनेला चिमटा काढण्याची एकही संधी सोडत नाहीयेत. भाजपचे नेते अतुल भातखळकर यांनी ट्विट करत शिवसेनेला डिवचले आहे.
“रिमझिम पाऊस पडे सारखा मिठीलाही पूर चढे पाणीच पाणी चहूकडे ग बाई गेले शिंदे कुणीकडे…”असे ट्विट करीत अतुल भातखळकर यांनी सेनेला चिमटा काढलाय. शिवाय सध्याच्या स्थितीवरून भाजपचे नेते शिवसेनेवर टीका करीत आहेत. “: ठाकरेंचे दिवस फिरले… ” असे ट्विट भाजप नेते निलेश राणे यांनी केले आहे तर नारायण राणे यांनी देखील ट्विट केले आहे. शाब्बास एकनाथजी योग्य वेळी योग्य निर्णय घेतलास, नाही तर लवकरच तुझा आनंद दिघे झाला असता.एक सूचक ट्विट केलं आहे. तेही जास्त चर्चेत आहे.
शाब्बास एकनाथजी योग्य वेळी योग्य निर्णय घेतलास, नाही तर लवकरच तुझा आनंद दिघे झाला असता.
— Narayan Rane (मोदी का परिवार) (@MeNarayanRane) June 21, 2022