नवी दिल्ली – पंजाबमधील जनतेसमोर निवडणुकीच्या वातावरणात मोठी आव्हाने आहेत. त्यांचा योग्य मुकाबला करणे महत्त्वाचे आहे. पंजाबमधील शेतकऱ्यांची समृद्धी आणि बेरोजगारी केवळ कॉंग्रेसच दूर करू शकते, असे मत माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी आज पंजाबच्या जनतेला केले. तर मी कमी बोललो असेल पण काम मात्र लोककल्याणाचेच केले.
वाढती महागाई, बेरोजगारी आणि शेतकऱ्यांच्या समस्यावर देखील त्यांनी पंतप्रधान मोदी यांच्यावर प्रखर शब्दांत टीका केली.
पंतप्रधानपदाला विशेष महत्त्व आहे, असे माझे मत आहे. इतिहासाला दोष देऊन तुमचे पाप कमी होऊ शकत नाही. पंतप्रधान म्हणून काम करताना मी जास्त बोलण्याऐवजी कामाला प्राधान्य दिले. आम्ही राजकीय फायद्यासाठी देशाचे विभाजन केले नाही. सत्य झाकण्याचा कधीही प्रयत्न केला नाही. तर यावरच आता भाजप नेते अतुल भातखळकर यांनी ट्वीट करत प्रतिउत्तर दिले आहे.
डॉ मनमोहन सिंह यांच्या पक्षाचा राष्ट्रवाद देशाच्या संसाधनांवर पहिला हक्क अल्पसंख्याकाना बहाल करणारा, आणि हिंदूंना दहशतवादी ठरवणारा होता, म्हणून मतदारांनी काँग्रेसच्या पेकाटात लाथ घातली. pic.twitter.com/ZncaYl3iwi
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) February 18, 2022
त्यांनी ट्विट केले आहे की,’डॉ मनमोहन सिंह यांच्या पक्षाचा राष्ट्रवाद देशाच्या संसाधनांवर पहिला हक्क अल्पसंख्याकाना बहाल करणारा, आणि हिंदूंना दहशतवादी ठरवणारा होता, म्हणून मतदारांनी काँग्रेसच्या पेकाटात लाथ घातली.’ असेही ते म्हणाले आहे.
दरम्यान, देशातील 5 राज्यांमध्ये होत असलेल्या निवडणुकीत माजी पंतप्रधान डॉ.मनमोहन सिंह यांचीही एंट्री झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अबोहर सभेपूर्वी त्यांनी व्हिडिओद्वारे केंद्र सरकारवर निशाणा साधला. माजी पंतप्रधान म्हणाले की, मोदी सरकारचा राष्ट्रवाद खोटा आहे. जो ‘फोडा आणि राज्य करा’ हे धोरण अवलंबतो. डॉ.सिंह यांनीही चीनच्या मुद्द्यावरून केंद्र सरकारला घेरले. ते म्हणाले की, एक वर्षापासून चिनी सैन्य भारताच्या पवित्र भूमीवर बसले आहे. या सरकारचा संविधानावर विश्वास नाही. घटनात्मक संस्था सतत कमकुवत होत आहेत. सरकार केवळ देशातच नाही तर परराष्ट्र धोरणाच्या मोर्चावरही अपयशी ठरले आहे.
आपल्या पवित्र भूमीवर गेल्या एक वर्षापासून चिनी सैन्य ठाण मांडून आहे. हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला जात आहे. जुने मित्र आपल्यापासून दूर जात आहेत. डॉ.सिंग म्हणाले की, पंजाबमधील जनतेसमोर निवडणुकीच्या वातावरणात मोठी आव्हाने आहेत. त्यांचा योग्य मुकाबला करणे महत्त्वाचे आहे. पंजाबमधील शेतकऱ्यांची समृद्धी आणि बेरोजगारी केवळ कॉंग्रेसच दूर करू शकते. पंजाबच्या मतदारांनी हे लक्षात ठेवले पाहिजे. ते म्हणाले की, भारत आज एका महत्त्वाच्या वळणावर उभा आहे. मला पंजाब, उत्तराखंड, उत्तर प्रदेश, गोवा आणि मणिपूर येथील माझ्या बंधू-भगिनींसोबत देशातील आणि राज्यातील परिस्थितीवर चर्चा करण्याची खूप इच्छा होती, परंतु डॉक्टरांच्या सल्ल्याने मी ते असे संबोधित करत आहे.
आज देशातील परिस्थिती चिंताजनक आहे. करोनाच्या काळात केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे अर्थव्यवस्था एका बाजूला कोलमडली आहे. महागाई आणि बेरोजगारीने जनता हैराण झाली आहे. दुसरीकडे 7 वर्षे सरकार चालवूनही केंद्र सरकार चुका मान्य करत नाही. लोकांच्या समस्यांसाठी ते पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांना जबाबदार धरत आहेत.
– डॉ. मनमोहन सिंग, माजी पंतप्रधान