भोर – तालुक्यातील ब्रिटिश कालीन भाटघर धरण शंभर टक्के भरले असून 11 स्वयंचलित दरवाजातून 1171 क्युसेस प्रती सेकंद वेगाने पाण्याचा विसर्ग सुरु असुन नीरानदी काठच्या गावांना सर्तकतेचा ईशारा देण्यात आला असल्याची माहिती शाखा अभियंता आनिल नलावडे यांनी दिली.
गतवर्षीच्या तुलनेत या वर्षि पाऊस कमी आसल्याने धरण 21 दिवस उशिराने भरले आहे. भाटघर धरण हे 23.75 टिएमसी पाणी साठवण क्षमतेचे आहे. या धरणाला एकूण 81 दरवाजे असून त्यातील 45 दरवाजे स्वयंचलित आहेत. 36 दरवाजे रोलिंगचे आहेत. यातून प्रतिसेकंदाला 56000 क्युसेसने एकाचवेळी पाणी सोडण्याची व्यवस्था केलेली आहे.
भाटघर धरण मगिल वर्षी 21 ऑगस्टला भरले होते. मात्र या वर्षि पावसाचे प्रमाण कमी असल्याने धरण 21 दिवस उशिराने भरले आहे. तीन जिल्ह्यांना वरदान ठरत असलेल्या या धरणाचे पाण्यावर 9 तालुक्यातील 2 लाख 50 हजार हेक्टर शेतीला या पाण्याचा फायदा होत असतो. पुर्वेकडील लोकांचे शेतीला बारमाही पाणी पुरवठा होत असल्याने बागायती शेती बरोबरच पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला आहे. शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंदाचे वारे वाहू लागले आहेत.
भाटघर धरण १००% भरल्याने धरणाच्या मोर्यांमधून फेसाळत वाहणारे पाणी आणि निसर्गाने दाटलेल्या हिरवाईचा आनंद लुटण्या साठी धरण स्थळावर पर्यटकांची गर्दी होत आहे.
संपुर्ण धरणाचे बांधकाम हे दगडी असून ब्रिटीश कालीन असलेल्या या धरणाची लांबी एक किमी आहे. धरणाचे बॅक वाॅटर हे 47 किमी अंतरापर्यंत पसरलेले आहे. या धरणाचे पोटात एस आकाराचे ही एक धरण आसून ते उन्हाळ्याचे दिवसात पहायला मिळते.