बारामती – बारामती तालुक्यातील कोऱ्हाळे बुद्रुक येथील जवान बिंटू राजाराम सुळ यांना जम्मू काश्मीर येथे मंगळवारी (दि. २९ डिसेंबर) कर्त्यव्य बाजावत असताना वीरमरण आले. शनिवारी (दि. २) बिंटू सुळ यांचे पार्थिव त्यांच्या मुळ गावी कोऱ्हाळे येथे आणण्यात आले. यावेळी हजारोच्या संख्येनी ग्रामस्थ उपस्थित होते.भारत माता की जय, वंदे मातरम, जवान बिंटु राजाराम सूळ अमर रहे या घोषणांनी आसमंत दुमदुमला.
अत्यंत शोकाकुल वातावरणात सुळ यांची अंत्ययात्रा निघाली होती.यावेळी नागरिकांनी उत्स्फूर्तपणे भारत माता की जय, जवान बिंटु सूळ अमर रहे, वंदे मातरम च्या घोषणा दिल्या. गावकऱ्यांनी साश्रू नयनांनी भारत मातेच्या या सुपुत्रास निरोप दिला.
जवान बिंटु सूळ यांच्यामागे त्यांच्या मागे आई-वडील, पत्नी, दोन मुले दोन भाऊ असा परिवार आहे. सुभेदार सुळ यांचे पुत्र अमर यांनी पार्थिवाला अग्नी दिला यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे कार्यालयीन अधिक्षक हनुमंत पाटील, तहसीलदार विजय पाटील, गटविकास अधिकारी राहुल काळभोर यांच्यासह तालुक्यातील सामाजिक, शैक्षणिक, राजकीय पदाधिकाऱ्यांनी पार्थिवाचे अंतिम दर्शन घेतले.