BAN vs IND – भारत आणि बांगलादेश यांच्यातील वनडे मालिकेला आजपासून सुरुवात झाली आहे. मालिकेतील पहिला सामना ढाका येथील शेर-ए-बांगला स्टेडियमवर खेळला जात आहे. भारतीय संघ सात वर्षांनंतर बांगलादेशात एकदिवसीय मालिका खेळण्याची आला आहे. या मालिकेसाठी कर्णधार रोहित शर्मासह विराट कोहली आणि केएल राहुल यांचे संघात पुनरागमन झाले आहे. तर या एकदिवसीय मालिकेतून भारतीय संघाचा यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंत दुखापतीमुळे बाहेर पडला आहे. त्यामुळे आता त्याच्या जागी संघात केएल राहुल यष्टीरक्षण करताना पाहायला मिळणार आहे.
“माझं नाव त्याच्यासोबत जोडलं…’; ऋतुराजसोबत असलेल्या नात्यावर अखेर सायली संजीव झाली व्यक्त
सामान्यांच्या सुरुवातीला बांगलादेशने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघ बांगलादेशच्या गोलंदाजीसमोर अपयशी ठरला. बांगलादेशच्या गोलंदाजांनी खेळपट्टीचा फायदा घेत भारतीय संघाला १८६ धावांवरच रोखले. केएल राहुलने एकाकी झुंज देत ७३ धावांची अर्धशतकीय खेळी केली. याव्यतिरिक्त कोणत्याही फलंदाजाला मोठी खेळी करता आलेली नाही. कर्णधार रोहित आणि विराट कोहलीकडून चाहत्यांना मोठ्या अपेक्षा होत्या मात्र दोघेही अनुक्रमे २७ आणि ९ धावांवर एकाच षटकात बाद झाल्याने भारतीय संघ अडचणीत सापडला.
“माझं नाव त्याच्यासोबत जोडलं…’; ऋतुराजसोबत असलेल्या नात्यावर अखेर सायली संजीव झाली व्यक्त
बांगलादेश संघाला हा सामना जिंकण्यासाठी १८७ धावांची आवश्यकता आहे. यजमान संघाकडून गोलंदाजीत शाकिब अल हसनने ५ गडी बाद केले. यादरम्यान त्याने रोहित आणि विराट यांना एकाच षटकात बाद केले होते. त्याचबरोबर इबादत हसनने ४ फलंदाजांना बाद केले. तर मेहीदी हसन याने १ गडी बाद केला. भारताकडून फलंदाजीत केएल राहुलने ७० चेंडूत ४ षटकार आणि ५ चौकारांच्या साहाय्याने ७३ धावांची खेळी खेळली.