भारत आणि बांगलादेश ( BAN vs IND ) यांच्यात आज पहिला एकदिवसीय सामना खेळवला जात आहे. हा सामना सुरु होण्याच्या काही तासांपूर्वी भारतीय संघाचा यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंत खेळणार नसल्याची माहिती समोर आली. त्यानंतर तो बांगलादेशविरुद्धच्या या एकदिवसीय मालिकेतून बाहेर झाला असल्याचेही समोर आले. पंतच्या या मालिकेतून बाहेर पडण्याबाबत बीसीसीआयने ट्विट करून माहिती दिली. त्याचबरोबर त्याच्या जागी इतर खेळाडूचा संघात समावेश करण्याबाबत कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.
#BANvsIND | राहुल एकटा लढला! बांगलादेशच्या गोलंदाजांसमोर टीम इंडियाचा फ्लॉप शो
ऋषभ पंत या मालिकेतून बाहेर पडल्यानंतर आता संघाचा फलंदाज केएल राहुलकडे यष्टिरक्षणाची जबाबदारी देण्यात आली आहे. मात्र पंत असा अचानक ( BAN vs IND ) या मालिकेतून बाहेर का पडला? याबाबत चाहत्यांच्या मनात संभ्रम निर्माण झाल्याचे चित्र आहे. न्यूझीलंडविरुद्ध नुकत्याच संपलेल्या एकदिवसीय मालिकेत ऋषभ पंतने एका सामन्यात १० धावा आणि दुसऱ्या सामन्यात १५ धावा केल्या होत्या. त्याच्या या खराब कामगिरीनंतर त्याच्यावर मोठ्या प्रमाणात टीका झाली.
#BANvsIND | राहुल एकटा लढला! बांगलादेशच्या गोलंदाजांसमोर टीम इंडियाचा फ्लॉप शो
मागील काही सामन्यात ऋषभ पंतची कामगिरी असतानाही त्याची बांगलादेश ( BAN vs IND ) दौऱ्यासाठी निवड झाली होती. मात्र पहिल्या एकदिवसीय सामन्याअगोदरच पंत या मालिकेतून बाहेर पडल्याचे समोर आले. बीसीसीआयने ट्विट करत म्हटले आहे की, ‘बीसीसीआयच्या मेडिकल टीमच्या सल्ल्यानंतर ऋषभ पंतला वनडे संघातून विश्रांती दिली जात आहे. तसेच कसोटी मालिका सुरू होण्यापूर्वी तो संघात सामील होईल. त्यांच्या बदली खेळाडूंची घोषणा झालेली नाही. तर अक्षर पटेल पहिल्या एकदिवसीय सामन्यासाठी उपलब्ध नव्हता.’
🚨 UPDATE
In consultation with the BCCI Medical Team, Rishabh Pant has been released from the ODI squad. He will join the team ahead of the Test series. No replacement has been sought
Axar Patel was not available for selection for the first ODI.#TeamIndia | #BANvIND
— BCCI (@BCCI) December 4, 2022
भारतीय संघाची फलंदाजी ढेपाळली
नाणेफेकीचा कौल बांगलादेशच्या बाजूने लागल्यानंतर भारतीय संघाला प्रथम फलंदाजी करावी लागली. भारतीय संघाची सलामी जोडी शिखर धवन आणि रोहित शर्मा अपयशी ठरले. यानंतर विराट आणि श्रेयस अय्यर देखील फ्लॉप राहिले. भारतीय संघाकडून केएल राहुलने सावध फलंदाजी करत ७० चेंडूत ७३ धावांची खेळी खेळली. याव्यतिरिक्त कोणत्याही फलंदाजाला मोठी खेळी करता आलेली नाही. बांगलादेशकडून शाकिब अल हसनने ५ गडी बाद केले. भारताने दिलेल्या १८७ धावांच्या प्रत्युत्तरात बांगलादेश संघ १० षटकात २ गडी गमावून २६ धावांवर खेळात आहे.