बांगलादेश आणि भारत (BAN vs IND) यांच्यात एकदिवसीय मालिकेतील पहिला सामना आज ढाका येथे खेळला जात आहे. यजमान संघाचा कर्णधार लिटन दासने नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. फलंदाजीत टीम इंडियाची सुरुवात खूपच खराब झाली. सलामीला शिखर धवन, कर्णधार रोहित शर्मा आणि त्यानंतर विराट कोहली झटपट बाद झाले. त्यामुळे मधल्या फळीतील फलंदाजांवर दबाव आला आणि भारतीय संघ अवघ्या १८६ धावांवरच सर्वबाद झाला.
#BANvsIND | ऋषभ पंतला अचानक संघातून बाहेर काढून टाकण्यामागचे कारण आले समोर!
दरम्यान, बांगलादेशच्या डावावेळी विराट कोहलीने क्षेत्ररक्षणात अप्रतिम अशी कामगिरी केली. त्याने वॉशिंग्टन सुंदरच्या गोलंदाजीवर शकिब-अल-हसनचा जबरदस्त झेल घेतला. भारतीय संघाने दिलेल्या १८७ धावांच्या छोट्या लक्ष्याचा पाठलाग करताना बांगलादेश संघाची सुरुवातही खराब झाली. डावाच्या पहिल्या षटकात दीपक चहरच्या पहिल्याच चेंडूवर नजमुल शांतो बाद झाला. त्यानंतर २६ धावांवर संघाला दुसरा धक्का बसला. मात्र त्यानंतर यजमान संघाचा अनुभवी फलंदाज शाकिब-अल-हसन फलंदाजीला आला. शाकिबने कर्णधार लिटन दाससह ४८ धावांची भागीदारी केली.
#BANvsIND | ऋषभ पंतला अचानक संघातून बाहेर काढून टाकण्यामागचे कारण आले समोर!
लिटन दास बाद झाल्यानंतर काही वेळातच शाकिबने विराट कोहली क्षेत्ररक्षण करत असलेल्या कव्हरच्या दिशेने जोरदार फटका खेळला. मात्र, कोहलीने एका हाताने अप्रतिम झेल घेतला. हा झेल घेतल्यानंतर शाकिबला देखील आश्चर्य वाटले आणि तो विराटकडे पाहतच राहिला. शाकिब-अल-हसनने गोलंदाजीत ५ बळी घेतले होते, तर फलंदाजीत २९ धावांचे योगदान दिले. महत्वाचं म्हणजे विराट फलंदाजी करत असताना शकिब-अल-हसन यानेच विराटला ९ धावांवर बाद केले होते.