मुंबई – झी मराठी वाहिनीवरील ‘काहे दिया परदेस’ या मालिकेतून प्रेक्षकांची मने जिंकणारी गौरी म्हणजेच, अभिनेत्री ‘सायली संजीव’ आज महाराष्ट्रातील घराघरात पोहचली आहे. सायली संजीवने या मालिकेत झळकण्याआधी काही चित्रपटांमध्ये काम केले होते. तसेच, ‘काहे दिया परदेस’ ही मालिका संपल्यानंतर तिने गुलमोहर या मालिकेत काम केले होते. सध्या सायली आपल्या बहुचर्चित “गोष्ट एका पैठणीची’ या चित्रपटामुळे चांगलीच चर्चेत आली आहे.
दरम्यान, असं असलं तरी सायली संजीव आणि भारतीय क्रिकेटपटू ऋतुराज गायकवाड यांच्या डेटिंगच्या चर्चा गेल्या वर्षभरापासून रंगत आहेत. मात्र, आता पुन्हा एकदा सायलीने यावर भाष्य केल्याने हा विषय चर्चेत आला आहे. अभिनेत्रीने मोठा खुलासा केल्याचं दिसून आलं आहे.
एका मुलाखतीत सायलीला ऋतुराज सोबत असलेल्या नात्याबद्दल विचारण्यात आलं. महत्त्वाचं म्हणजे सायलीने दिलेल्या उत्तराकडे सर्वांना थक्क केलं आहे. यावेळी अभिनेत्री म्हणाली, ‘जेव्हा आमच्या नात्याबद्दल चर्चा रंगू लागल्या तेव्हा त्याचा परिणाम आमच्या मैत्रीवर झाला.
आता आमच्या नात्यात दुरावा निर्माण झाला आहे. आता आम्ही मित्रासारखं बोलू देखील शकत नाही. माझं नाव त्याच्यासोबत जोडलं जातंय हे देखील मला माहित नव्हतं… आमच्या वयाबद्दल देखील सर्वत्र चर्चा रंगू लागल्या. मी 29 वर्षांची आणि ऋतुराज 25 वर्षांचा आहे. असं देखील अभिनेत्री म्हणाली आहे.