Manoj Jarange Patil : मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकारने वेळोवेळी हुलकावणी दिली आहे. त्यामुळे मुंबईत येत्या 20 जानेवारीपासून आंदोलन करणार आहे. आता मुंबईकडे कूच केल्याशिवाय पर्याय नाही. राज्यातील गावोगावचे साखळी उपोषण स्थगित करून लोकांनी मुंबईला पायी प्रवासाची तयारी करावी, असे आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी केले आहे. त्यामुळे मराठा आंदोलकांसह मनोज जरांगे पाटील मुंबईत येणार आहेत.
मात्र, याआधी आमदार बच्चू कडू यांनी जरांगेंची भेट घेतली आहे. आज अंतरवली सराटीत जात बच्चू कडू यांनी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर या दोघांमध्ये चर्चा झाली असल्याचं सांगण्यात येत आहे. यावेळी आमदार बच्चू कडू यांनी मनोज जरांगे यांच्याशी विविध मुद्द्यांवर चर्चा केली.
कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या पार्श्वभूमीवर ‘सगे सोयरे’ या शब्दावरून सध्या संभ्रम आहे. यावर या दोघांनी चर्चा केली. तसेच, एखाद्या कुटुंबाची कुणबी असण्याची नोंद आढळली तर त्यांच्या नातलगांनाही कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावं, अशी मोनज जरांगे यांची मागणी आहे. त्या मुद्द्यावर देखील या दोघांमध्ये चर्चा झाली.