नवी दिल्ली – अयोध्या वादग्रस्त जमीन प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाची सहाव्या दिवशीही सुनावणी चालू आहे. आजही पक्षकार सी.एस. वैद्यनाथ यांनी बाजू मांडली. यादरम्यान न्यायालयाने पुन्हा एकदा रामजन्मभूमीवरील हक्क असणारे पुरावे सादर करण्यास सांगितले आहे. यावेळी ऐतिहासिक पुस्तके, परदेशी यात्रांचे वृत्त, वेद आणि स्कंद पुराण न्यायालयात सादर करण्यात आली.
वकील वैद्यनाथ म्हणाले कि, हिंदूंचा विश्वास आहे की श्रीरामांचा जन्म अयोध्येत झाला आहे आणि न्यायालयानेही त्यापुढे जाऊ नये. तसेच राम जन्मभूमीवरील मंदिर बाबर किंवा औरंगजेब यांनी तोडले होते, जागतिक स्तरावर लिहिलेल्या तथ्यांमध्ये संभ्रम आहे. परंतु राम अयोध्याचा राजा होता आणि तेथेच त्याचा जन्म झाला, पुस्तकांमध्ये याबद्दल कोणताही गोंधळ नाही. एवढेच नव्हे तर फ्रेंच प्रवासी विल्यम फिंच 1608 ते 1611 पर्यंत अयोध्येत वास्तव्य करत रामजन्मभूमीचे अस्तित्व स्पष्ट करणारे पुस्तक लिहिले. वरिष्ठ वकील सी.एस. वैद्यनाथन यांनी रामलला विराजमान यांच्या वतीने स्कंद पुराणातील संदर्भ दिला. ते म्हणाले की, शरयू नदीत स्नान केल्यावर राम जन्मभूमी पाहिल्याचा फायदा होतो, असे त्यांनी सांगितले.
परंतु,सर्वोच्च न्यायालयाने म्हंटले कि, तुम्ही हे राम जन्मभूमीच्या तत्वज्ञानाबद्दल सांगत आहेत. देवताबद्दल नव्हे. हे पुराण कधी लिहिले गेले होते? यावर वैद्यनाथन यांनी उत्तर दिले कि, हे पुराण वेद व्यास यांनी महाभारत काळात लिहिले होते, पण ते किती जुने आहे हे कोणालाही ठाऊक नाही, असे स्पष्टीकरण त्यांनी दिले.