बेंगळुरू – येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत सराव करत असलेल्या रोहित शर्माने संघव्यवस्थापनला कळवले आहे की, तो कोणत्याही क्रमांकावर फलंदाजी करण्यास तयार असून, कोणत्याही विशिष्ट क्रमांकाचा अथवा सलामीवीर म्हणूनच खेळण्याचा आपला आग्रह नाही.
रोहितने कसोटीत सलामीवीर म्हणून फलंदाजी केली आहे. पण ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणाऱ्या कसोटी मालिकेत तो संघाच्या गरजेनुसार मधळ्या फळीतही फलंदाजी करण्यास तयार आहे. भारताचा कर्णधार विराट कोहली पहिल्या कसोटी सामन्यानंतर मायदेशात परत येणार आहे. तेव्हा उपकर्णधार अजिंक्य रहाणे आणि चेतेश्वर पुजारा यांच्यासह रोहित मोठी भूमिका बजावू शकतो.
वृत्तसंस्थेला दिलेल्या प्रदीर्घ मुलाखतीच्या दुसऱ्या भागात रोहितने हा खुलासा केल्याने, नव्या चर्चांना तोंड फुटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मी तेच बोलणार जे याआधी म्हटले होते. भारतीय संघ मी ज्या क्रमांकावर फलंदाजी करण्यास सांगेल त्या ठिकाणी मी फलंदाजी करेन. मला माहिती नाही की मी सलामीला फलंदाजी करण्यास येईन की अन्य कोणत्या क्रमांकावर. मला पूर्ण विश्वास आहे की, ऑस्ट्रेलियात पोहोचलेले संघ व्यवस्थापन कर्णधार विराट कोहली भारतात परतल्यानंतर कोणता खेळाडू नेतृत्व करेल याची निवड करतील.
दरम्यान, प्रशिक्षण पूर्ण करून रोहित ऑस्ट्रेलियात दाखल होईल. तोपर्यंत भारतीय संघ त्याची भूमिका निश्चित करेल.