क्विन्सलॅंड – भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्या महिला क्रिकेट संघात आजपासून गुलाबी चेंडूवर एकमेव दिवस-रात्र कसोटी खेळली जाणार आहे. भारतीय महिला संघ इतिहासात प्रथमच दिवस-रात्र कसोटी सामना खेळणार असून, त्यात वर्चस्व गाजवण्याचे संघासमोर आव्हान राहणार आहे.
या सामन्यापूर्वीच भारतीय संघाला अनुभवी खेळाडू हरमनप्रीत कौर दुखापतीमुळे खेळू शकणार नसल्याने मोठा धक्का बसला आहे. त्यामुळे कर्णधार मिताली राज, स्मृती मानधना या दोन प्रमुख फलंदाजांवरच संघाची मदार राहणार आहे.
हरमनप्रीत अद्याप अंगठ्याला झालेल्या दुखापतीतून सावरली नसल्यामुळे तिच्या जागी पूनम राऊत, यास्तिका भाटिया यांच्यापैकी एका खेळाडूला स्थान दिले जाऊ शकते.
संघाच्या गोलंदाजीची मदार अनुभवी वेगवान गोलंदाज झुलन गोस्वामीसह नवोदित मेघना सिंह यांच्यावर राहणार आहे.