कॅनबेरा : एलिस पेरीच्या अष्टपैलू खेळाच्या जोरावर ऑस्ट्रेलियाच्या महिला संघाने तिरंगी टी-२० क्रिकेट मालिकेतील सामन्यात भारतीय महिला संघाचा चार विकेटनी पराभव करत विजय नोंदविला.
#TeamIndia fought hard but it was Australia who won the match.
Scorecard 👉👉 https://t.co/2fMLhRAidM#AUSWvINDW pic.twitter.com/EEvVw6Mo8b
— BCCI Women (@BCCIWomen) February 2, 2020
भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना स्मृती मानधनाच्या ३५ आणि हरमनप्रीत कौरच्या २८ धावांच्या खेळीच्या जोरावर २० षटकांत ९ बाद १०३ धावा केल्या होत्या. या दोघींचा अपवाद वगळता इतर फलंदाजांनी निराशा केली. आॅस्ट्रेलियाकडून गोलंदाजीत एलीस पेरीने १३ धावा देत सर्वाधिक ४ तर व्हॅलमिन्क हिने १३ धावा देत ३ विकेट घेतल्या.
Nicola Carey hits the winning runs and Australia seal a four-wicket victory over India in Canberra.
Ellyse Perry made a measured 49 off 47. #AUSvIND SCORECARD: https://t.co/PQ34cKPwsH pic.twitter.com/GzWnT6hP5s
— ICC (@ICC) February 2, 2020
विजयासाठी १०४ धावांचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियन संघाची ३ बाद ५२ अशी अवस्था झाली होती पण एलिस परीने ४९ धावांची खेळी करत ऑस्ट्रेलियाला विजय मिळवून दिला. आॅस्ट्रेलियाने विजयी लक्ष्य १८.५ षटकांत ६ विकेटच्या मोबदल्यात पूर्ण केले. गार्डनर हीने २२ धावा केल्या. भारताकडून गोलंदाजीत राजेश्वरी गायकवाड हिने २ तर दीप्ती शर्मा, रेड्डी आणि राधा यादव यांनी प्रत्येकी १ विकेट घेतली.