“करोना’मुळे कॅशलेस व्यवहारांना पसंती
पिंपरी – करोनाचा फैलाव रोखण्यासाठी सरकारने संपूर्ण देशात “लॉकडाऊन’ केले आहे. परंतु जीवनावश्यक सेवांना सूट दिली आहे. यामुळे शहरातील बॅंका आणि एटीएम सुरुच आहेत. असे असले तरी सध्या बॅंकांमध्ये रोजच्या तुलनेत खूपच कमी गर्दी दिसून येत आहे. तसेच बहुतेक नागरिक एटीएममधून कॅश काढणे देखील टाळत आहेत. नोटा, एटीएम मशीन यांना अनेकांचा स्पर्श होत असल्याने “करोना’चा संसर्ग होण्याची भीती असल्याने “कॅशलेस’ व्यवहारांनाच अत्याधिक पसंती दिली जात आहे.
सामान्य नागरिक बॅंका अथवा एटीएममध्ये पैसे काढण्यासाठीही घराबाहेर पडताना दिसून येत नाही. त्याचप्रमाणे एटीएम मशीनच्या माध्यमातून संसर्ग होण्याच्या भीतीने अनेकजण रोखीचे व्यवहार करण्याऐवजी कॅशलेस, ऑनलाईन व्यवहार करण्यास पसंती देत आहेत. त्यामुळे नोटबंदीच्या काळानंतर आता पुन्हा एकदा मोबाइल ऍपच्या माध्यमातून अर्थिक व्यवहारांचे प्रमाण वाढल्याचे दिसून येत आहे.
देशात 8 नोव्हेंबर 2016 रोजी नोटाबंदीचा निर्णय झाल्यानंतर रोख स्वरुपात चलन टंचाई निर्माण झाल्याने अचानक कॅशलेस व्यवहार वाढले होते. त्यानंतर बाजारत चलन प्रवाह सुरळीत झाल्यानंतर हे प्रमाण सामान्य झाले होते. यामध्ये आता पुन्हा वाढ झाली आहे. तेव्हा एवढ्या मोठ्या प्रमाणात ऍप नव्हते. अनेक लोकांना ऍपद्वारे व्यवहाराचे ज्ञानही नव्हते. परंतु आता भाजीवाल्यांपासून लहान-मोठे सर्व दुकानदार ऍपच्या माध्यमातून पैसे स्वीकारत आहेत.
कोणतीही आपत्ती आली तरी सुरुवातीला हातामध्ये काही पैसे असावेत यासाठी सर्वसामान्य नागरिकांकडून बॅंका, एटीएममध्ये पैसे काढण्याची लगबग सुरु होते. मात्र देशभरात, संचारबंदी लागू केल्यानंतरही नागरिकांकडून एटीएममधून पैसे काढण्यापेक्षा कॅशलेस व्यवहार करण्यावर भर दिला आहे.
अनेकांचा होतो स्पर्श
करोनाचा प्रसार रोखण्यासाठी सरकारकडून विविध उपाययोजना केल्या जात आहेत, नागरिकांनीही स्वतःहून एटीएममधून पैसे काढण्यासाठी टाळण्यास सुरुवात केली आहे. एटीएममध्ये आर्थिक व्यवहार करण्यासाठी ये-जा करणाऱ्यांची संख्या अधिक असते. त्या प्रत्येकाचा मशीनला