पुणे : महाराष्ट्र आणि जम्मू-काश्मीरदरम्यान रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेत दुसरी लढत गहुंजे येथील महाराष्ट्र महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावर सुरू आहे. या लढतीत महाराष्ट्राने जम्मू-काश्मीर संघाला पहिल्या डावात २०९ धावांत गुंडाळले. त्यानंतर महाराष्ट्राने पहिल्या दिवसअखेर ३ बाद ५१ अशी मजल मारली आहे. महाराष्ट्र अजूनही १५८ धावांनी पिछाडीवर आहे.
End Innings: J & K – 209/10 in 63.5 overs (Abid Mushtaq 50 off 55, Mohammed Mudhasir 18 off 18) #MAHvJK @paytm #RanjiTrophy
— BCCI Domestic (@BCCIdomestic) December 17, 2019
महाराष्ट्राने नाणेफेक जिंकत क्षेत्ररक्षण स्विकारताना जम्मू-काश्मीर संघास प्रथम फलंदाजीस पाचारण केलं होतं. त्यानंतर महाराष्ट्राच्या भेदक गोलंदाजीसमोर जम्मू काश्मीरचा पहिला डाव ६३.५ षटकांत २०९ धावांवर आटोपला. जम्मू-काश्मीरकडून फलंदाजीत अहमद बंडाय याने सर्वाधिक ७६ तर अबीद मुश्ताकने ५० धावा केल्या. या दोघां व्यतीरिक्त एकही फलंदाज मैदानावर तग धरू शकला नाही. महाराष्ट्रकडून गोलंदाजीत संकलेचाने सर्वाधिक ४ तर चौधरी, देशमुख आणि सत्यजित बच्छाव यांनी प्रत्येकी २ गडी बाद केले.
Stumps Day 1: Maharashtra – 51/3 in 15.4 overs (S S Bachhav 0 off 3, M S Trunkwala 31 off 34) #MAHvJK @paytm #RanjiTrophy
— BCCI Domestic (@BCCIdomestic) December 17, 2019
प्रत्युत्तरात महाराष्ट्राने पहिल्या डावात फलंदाजी करताना दिवसअखेर ३ बाद ५१ अशी मजल मारली. रूतुराज गायकवाड १०, नौशाद शेख ९ आणि सत्यजित बच्छाव शून्यावर बाद झाले. जम्मूकडून अबीद मुश्ताकने २ तर उमर नाझीरने १ गडी बाद केला. पहिल्या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा मुर्तझा ट्रंकवाला नाबाद ३१ धावांवर खेळत होता.