मुंबई : महाराष्ट्रात शुक्रवारी मध्यरात्रीपासून नव्या राजकारणाने सुरूवात केली आहे. त्याचाच दुसरा अंक आज मध्यरात्री सुरू राहिला. कारण उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यांनतर अजित पवार दिवसभर बंधु श्रीनिवास पवार यांच्या घरीच थांबले होते. दरम्यान, यानंतर त्यांनी आज मध्यरात्री आपल्या बंधूचे घर सोडले आहे. दरम्यान, माध्यमांचा पाठलाग थांबवण्यासाठी त्यांनी अजित पवार आपल्या दक्षिण मुंबईतील निवासस्थानी गेले आहेत.
Mumbai: #Maharashtra Deputy CM Ajit Pawar leaves from his brother Sriniwas Pawar’s residence. pic.twitter.com/YGQFyvMbQj
— ANI (@ANI) November 23, 2019
अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर काल दिवसभर राज्यात नाट्यमय घडामोडी घडत होत्या. त्यातच मध्यरात्री अजित पवारांनी भाजपच्या नेत्यांची भेट घेतली असल्याचे सांगण्यात येत आहे. कारण आज होणाऱ्या सुनावणी संदर्भात अजित पवार आणि भाजप नेत्यांमध्ये चर्चा झाल्याचे बोलले जात आहे. मात्र यासंदर्भात अधिक माहिती समोर आली नाही.