नेवासा -प्रकल्पग्रस्तांच्या विविध समस्यांचे निराकरण करण्यासाठी व पुनर्वसन गावठाणाशी संबंधित उपाययोजने बाबत सर्वोतोपरी सहकार्य करू, असे आश्वासन उपविभागीय अधिकारी सुधीर पाटील यांनी लाखेफळ ग्रामस्थांना दिले.
जायकवाडी प्रकल्पग्रस्तांच्या विविध समस्यांचे निराकरण करण्यासाठी व पुनर्वसन गावठाणाशी संबंधित उपाययोजनेबाबत नेवासा तालुक्यातील लाखेफळ येथे पुनर्वसन अदालत आयोजित करणेचे आदेश पुनर्वसन उपजिल्हाधिकारी शाहुराव मोरे यांनी नेवासा तहसिलदार, कार्यकारी अभियंता, जायकवाडी प्रकल्प औरंगाबाद पाटबंधारे विभाग व कार्यकारी अभियंता, मुळा पाटबंधारे विभाग यांना दिले होते. त्यानुसार नेवासा तालुक्यातील लाखेफळ येथे प्रांताधिकारी सुधीर पाटील यांचे उपस्थितीत पुनर्वसन अदालत संपन्न झाली.
त्यानुसार बुधवारी सकाळी 11 वाजता पुनर्वसन अदालत झाली.
यावेळी उपविभागीय अधिकारी सुधीर पाटील, पुनर्वसन तहसीलदार मिलिंद कुलथे, नेवासा तहसीलदार डॉ.संजय बिरादार, भूमि अभिलेख विभागाचे गोसावी, जायकवाडी प्रकल्प औरंगाबाद पाटबंधारे विभागाचे अभियंता स्वप्निल देशमुख, मंडल अधिकारी फिरोज सय्यद, माळीचिंचोरा तलाठी सोपान गायकवाड, खरवंडीच्या तलाठी तळपे, माजी जिल्हा परिषद सदस्य तुकाराम शेंडे, प्रकल्पग्रस्तांचे नेते दिगंबर आवारे, योगिता काळे, अरुण मोटकर, संतोष गायकवाड, संजय बनकर, आत्माराम मोटकर, अंबादास शिरसाट, संदीप बनकर, गौतम गायकवाड, अमोल आवारे,
मिनीनाथ आवरे यांचेसह पुनर्वसित लाखेफळ गावचे ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते.लाखेफळ ग्रामस्थांच्या वर्ग दोनच्या जमिनी वर्ग एक करणे, ग्रामपंचायत स्वतंत्र करावी, सिटीसर्वे करून जमिनीची मोजमाप करून ताबा द्यावा, 300 रेशन कार्ड ऑनलाइन नसल्याने लाभ मिळत नाही, त्यामुळे ते ऑनलाइन करावेत, शाळेतील मुलांना जा-ये करण्यासाठी कालव्यावर पूल बांधावा आदी मागण्या ग्रामस्थांनी केल्या.