नवी दिल्ली: राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना भेटण्यापूर्वी पत्रकारांशी सवांद साधला. शिवसेना-भाजप सोबत लढले त्यामुळे त्यांनाच विचार सरकार कसे बनवणार, असे वक्तव्य पवारांनी केले. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या.
शरद पवार म्हणाले, सोनिया गांधी शिवसेनेशी युतीपासून वैचारिकदृष्ट्या सावध होत्या. कारण शिवसेना पक्ष हा भाजपचा सहयोगी होता. पण महाराष्ट्रात भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्यात यशस्वी होऊ, या कल्पनेवर बोलण्यास त्यांनी मान्य केले आहे.
‘शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस व कॉंग्रेसचे सरकार येईल असे तुम्हाला वाटते का?’ यावर उत्तर देताना पवार म्हणाले,”भाजप आणि शिवसेनेला विचारा, दोघे सोबत होते. शिवसेना आणि भाजप एकत्र निवडणूक लढले होते. आम्ही त्यांच्यासोबत लढलो नव्हतो. राष्ट्रवादी आणि काँग्रेस एकत्र लढले होते. आम्ही स्वतःचे राजकारण करू.” राष्ट्रवादी शिवसेनेसोबत मिळून सरकार बनवणार असल्याची चर्चा आहे, असं विचारलं असता त्यांनी केवळ ‘अच्छा’ म्हणून उत्तर दिले.