मुंबई – अभिनेत्री कंगना रणौत हीच उल्लेख ‘हरामखोर’ मुलगी असा केल्याने शिवसेना खासदार संजय विरोधकांच्या निशाण्यावर आहेत. अशातच आता राऊत यांनी टीकाकारांना आपल्या खास शैलीमध्ये उत्तर दिलं आहे. राऊत यांनी त्यांच्यावर टीका करणाऱ्यांना महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांनंतर झालेली राजकीय उलथापालथ लक्षात आणून दिली आहे.
आपल्या अधिकृत फेसबुक खात्यावर लिहिलेल्या एका संदेशामध्ये राऊत म्हणतात, “माझी ताकद काय आहे, हे त्या लोकांना विचारा, ज्यांच्याकडे १०५ आमदार असूनही विरोधकांच्या बाकांवर बसण्याची वेळ आली. जय महाराष्ट्र.”
राऊत यांच्या या विधानाचा थेट संबंध महाराष्ट्रामध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकांनंतरच्या राजकीय घडामोडींशी आहे. राज्यात भाजप १०५ आंदरांसह राज्यातील सर्वात मोठा पक्ष असताना देखील शिवसेनेने वेगळी वाट धरल्याने भाजपवर विरोधकांची भूमिका सांभाळण्याची वेळ आली.
गेल्या अनेक दशकांपासून शिवसेना-भाजप दरम्यान असलेली युती यंदाच्या विधानसभा निवडणुकांनंतर तुटली होती. एकत्र लढलेले शिवसेना-भाजप वेगळे होऊन नंतर शिवसेनेने राष्ट्रवादी व काँग्रेससोबत हातमिळवणी केली. या सर्व राजकीय घडामोडी घडत असताना शिवसेना नेते संजय राऊत सक्रिय असल्याचे महाराष्ट्राने पहिले आहे.