कोलंबो :- भारत-पाकिस्तान हे पारंपारिक प्रतिस्पर्धी संघ आशिया करंडकाच्या आर.प्रेमदासा स्टेडिअमवर आज दुपारी 3 होणाऱ्या सुपर-4 सामन्यात पुन्हा एकदा आमने-सामने येणार आहेत.
आमचा संघ श्रीलंकेच्या भूमीवर गेल्या दोन महिन्यांपासून सातत्याने क्रिकेट खेळत आहे. आमच्या खेळाडूंना श्रीलंकेतील खेळपट्यांची व परिस्थितीची चांगली जाणीव आहे. त्यामुळे या परिस्थितीत आम्ही भारतापेक्षा नक्कीच सरस ठरतो, असे पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमने भारताविरुद्धच्या सुपर-4 सामन्यापूर्वी बोलताना म्हटले.
याशिवाय संघाच्या गोलंदाजी व फलंदाजीबद्दल बोलताना बाबर पुढे म्हणाला, नवीन चेंडूने आम्ही नेहमीच चांगली सुरुवात केली आहे. याशिवाय आमच्या गोलंदाजांनी मधल्या षटकांमध्ये उत्कृष्ट गोलंदाजी दाखवली. आमच्या गोलंदाजांना मधल्या षटकांमध्ये विकेट्स काढता येत नाहीत. पण शेवटच्या षटकांमध्ये आम्ही शानदार गोलंदाजी करत आहोत हे तुम्हाला दिसेल. कोणताही खेळाडू अपयशी ठरला तर इतर खेळाडू त्याची भरपाई करत असतात. ही आमच्यासाठी चांगली गोष्ट आहे, असेही त्याने पुढे म्हटले.
दरम्यान, आजच्या सामन्यातही कोलंबोमध्ये 90 टक्के पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. साखळी फेरीतील पहिल्या सामन्यात पावसाने प्रेक्षकांच्या उत्साहाच्या रंगाचा बेरंग केल्याने या सामन्यात तरी वरूनराजाने न पावण्याची प्रेक्षकांची इच्छा असणार आहे.