नवी दिल्ली : बांगलादेश क्रिकेट मंडळाने देशाचे संस्थापक शेख मुजीबर रहमान यांच्या जन्मशताब्दी निमित्त दोन टी-२० सामन्यांचे आयोजन केले आहे. आशियाई इलेव्हन आणि जागतिक इलेव्हन या संघात हे सामने होणार आहेत. आशियाई संघात विराट कोहलीसह एकूण सहा भारतीय खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे.
हे सामने येत्या १८ आणि २१ मार्च रोजी होणार असून त्याला आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) अधिकृत दर्जा दिला आहे. आशियाई संघात भारताचा कर्णधार विराट कोहलीसह ६ भारतीय खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे. संघात यजमान बांगलादेशचे ४, अफगाणिस्तान आणि श्रीलंकेचे प्रत्येकी २ तर नेपाळचा १ खेळाडू आहे.
रोहित शर्मा तंदुरस्त ठरला तर तो सहभागी होईल. आशियाई संघात कोहलीसह लोकेश राहुल, शिखर धवन, रिषभ पंत, महंमद शमी, कुलदीप यादव या भारतीय खेळाडूंचा समावेश आहे. संघाच्या कर्णधाराची घोषणा लवकरच करण्यात येणार आहे.
आशियाई संघ : विराट कोहली, लोकेश राहुल, शिखर धवन, रिषभ पंत, महंमद शम्मी, कुलदीप यादव, लिटन दास, तमीम इक्बाल, मुशफिकुर रहीम, थिसारा परेरा, राशिद खान, मुस्तफिजुर रहमान, संदीप लामिछाने, लसिथ मलिंगा आणि मुजीब उर रहमान.