गांधीनगर – बलात्कार प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेले संत आसाराम बापू यांना गांधीनगर येथील न्यायालयाकडून मोठा धक्का बसला आहे. गांधीनगर न्यायालयाने आसाराम बापूंना महिला शिष्यावरील बलात्कारप्रकरणी दोषी ठरवले आहे. हा गुन्हा 2013 मध्ये दाखल झाला होता. सत्र न्यायालयाचे न्यायाधीश डी.के.सोनी यांनी मंगळवारी ( जानेवारी) शिक्षेच्या प्रमाणावरील निर्णय राखून ठेवला.
या प्रकरणातील सुनावणीदरम्यान न्यायालयाने आसारामच्या पत्नीसह अन्य सहा आरोपींची पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली.
या प्रकरणी आज झालेल्या सुनावणीची माहिती विशेष सरकारी वकील आर.सी.कोडेकर यांनी दिली. ते म्हणाले की, न्यायालयाने फिर्यादीची बाजू स्वीकारली आहे आणि सोमवारी आसारामला कलम 376/2(सी) (बलात्कार), कलम 377 (अनैसर्गिक गुन्हे) आणि भारतीय दंड संहितेच्या इतर तरतुदींनुसार बेकायदेशीर नजरकैदेत ठेवल्याबद्दल दोषी ठरवले आहे. आसाराम सध्या दुसऱ्या एका बलात्कार प्रकरणात जोधपूर तुरुंगात बंद आहेत.
ऑक्टोबर 2013 मध्ये सूरतमधील एका महिलेने आसाराम बापू आणि इतर सात जणांविरुद्ध बलात्कार आणि बेकायदेशीर कैदेत ठेवल्याचा गुन्हा दाखल केला होता. एका आरोपीचा खटला सुरू असतानाच मृत्यू झाला होता. या प्रकरणी पोलिसांनी जुलै 2014 मध्ये आरोपपत्र दाखल केले होते.
अहमदाबादच्या चांदखेडा पोलिस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आलेल्या एफआयआरनुसार, आसाराम बापूने पीडित महिलेवर ते दरम्यान अनेकदा बलात्कार केल्याचा आरोप आहे. जेव्हा तिच्यासोबत हा प्रकार घडला तेव्हा ती शहराच्या बाहेरील आश्रमात राहत होती.
वर्ष 2009 मध्ये आसाराम बापू तंत्र-मंत्र आणि काळ्या जादूच्या प्रकरणातून पुन्हा वादात आले होते. राजू चांडक नावाच्या व्यक्तीने आसाराम बापूंवर काळी जादू आणि तंत्र मंत्राच्या माध्यमातून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला होता. आसारामच्या आश्रमात महिलांचे लैंगिक शोषण होत असल्याचा आरोपही राजू चांडक यांनी केला.
डिसेंबर 2012 मध्ये राजस्थानच्या पाली जिल्ह्यात आसारामचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कथा संपल्यानंतर आसारामने ट्रॉली लावली आणि इलेक्ट्रॉनिक मशीनमधून प्रसाद म्हणून चॉकलेट्सचा वर्षाव सुरू केला. यामुळे अनेकांना त्रास झाला. सोजत गावचे हरिरामही कथा ऐकायला आले होते. चॉकलेटने त्याच्या डोळ्यांना इतकी दुखापत केली की त्याला थेट हॉस्पिटलमध्ये जावे लागले. आसारामवर निष्काळजीपणाचा गुन्हा दाखल झाला.
फेब्रुवारी 2013 मध्ये मध्य प्रदेशातील विदिशा येथे एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. येथे एक भक्त आसाराम बापूंच्या पायाला स्पर्श करण्यासाठी खाली वाकला, त्यानंतर आसारामने त्यांना लाथ मारली. यामुळे दुखावलेल्या भाविकाला बराच वेळ नीट चालताही येत नव्हते. भक्ताच्या तक्रारीवरून न्यायालयाने आसारामविरोधात जामीनपात्र वॉरंट जारी केले आहे.