arvind sawant – राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक (nawab malik) हे हिवाळी अधिवेशनात सहभागी झाले असून विधानसभा सभागृहात ते सत्ताधारी बाकावर जाऊन बसले. त्यामुळे एकच गोंधळ उडाला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पत्र लिहून मलिक यांना महायुतीत घेता येणार नाही, असे स्पष्ट केल्यानंतर राज्यातील अनेक बड्या नेत्यांनी यावर आपली प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे.
दरम्यान, अश्यातच ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत (arvind sawant) यांनी फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. यावेळी ते माध्यमांशी सवांद होते. अरविंद सावंत यांनी म्हटले आहे की, ‘त्यांना पत्र लिहिण्याचा नैतिक अधिकार आहे का? सर्व घाणेरडे कपडे त्यांच्या लॉन्ड्रीमध्ये आले आहेत. आणि त्यांनी धुतले आहेत. त्यांना आता नैतिक अधिकार आहेत का? देशभक्ती, राष्ट्रवाद, त्यांच्या अंत:करणात काहीही नाही, फक्त सत्तेसाठी त्यांचे प्रेम असून भाजपचा हा ढोंगीपणा आहे’, अशा शब्दांत सावंत यांनी भाजपवर हल्ला चढवला आहे.
#WATCH | On Maharashtra Deputy CM Devendra Fadnavis’s letter to NCP leader Ajit Pawar, Shiv Sena (UBT) MP Arvind Sawant says, “Does he have the moral right to write a letter? All dirty clothes have come to their laundry and they have washed them. What moral rights does he… pic.twitter.com/WqrCPB0JQZ
— ANI (@ANI) December 8, 2023
देवेंद्र फडणवीस आपल्या पत्रात म्हणतात….
“माजी मंत्री आणि विधानसभा सदस्य नवाब मलिक हे आज विधीमंडळ परिसरात येऊन कामकाजात सहभागी झाले होते. विधानसभा सदस्य म्हणून त्यांचा तो अधिकार सुद्धा आहे. त्यांच्याबाबत आमची वैयक्तिक शत्रूता अथवा आकस अजिबात नाही, हे मी प्रारंभीच स्पष्ट करतो. परंतू, ज्या पद्धतीचे आरोप त्यांच्यावर आहेत, ते पाहता, त्यांना महायुतीमध्ये घेणे योग्य ठरणार नाही, असे आमचे मत आहे.”
“सत्ता येते आणि जाते. पण सत्तेपेक्षा देश महत्त्वाचा आहे. सध्या ते केवळ वैद्यकीय आधारावर जामीन मिळाल्याने बाहेर आहेत. त्यांच्यावरील आरोप सिद्ध न झाल्यास आपण त्यांचे जरूर स्वागत करावे. मात्र अशाप्रकारचे आरोप असताना त्यांना महायुतीचा भाग करणे, हे योग्य नाही, असे आमचे स्पष्ट मत आहे. आपल्या पक्षात कोणाला घ्यायचे, हा सर्वस्वी आपला अधिकार आहे, हे मान्यच आहे. परंतु, त्यामुळे महायुतीला बाधा पोहोचणार नाही, याचा विचारही प्रत्येक घटक पक्षाला करावाच लागत असतो, त्यामुळे आमचा या गोष्टीला विरोध आहे”,
“त्यांना देशद्रोह्यांशी संबंध असल्याच्या आरोपाखाली अटक झाली तरी त्यांनी मंत्रिपदावर कायम ठेवणाऱ्या तत्कालीन मुख्यमंत्री आणि महाविकास आघाडी सरकारच्या विचारांशी आम्ही सहमती दाखवू शकणार नाही. आपण आमच्या भावनांची नोंद घ्याल, अशी मला आशा आहे.”