Arvind Kejriwal ED Arrest – मद्य घोटाळ्यात अरविंद केजरीवाल यांना अटक झाल्यानंतर दिल्ली तापली आहे. केजरीवालांची कालच २८ मार्चपर्यंत ईडीच्या कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. त्यांची आता चौकशी केली जाईल. केजरीवालच मद्य घोटाळ्याचे सूत्रधार असल्याचा आरोप भारतीय जनता पार्टीने केला आहे. । Arvind Kejriwal ED Arrest
तर दुसरीकडे भाजपने केजरीवाल यांच्या विरोधात कट रचल्याचा आरोप आम आदमी पार्टीने केला आहे. मात्र दिल्लीच्या आणि देशातल्या लोकांच्या मनात गेल्या ४८ तासांपासून एकच प्रश्न आहे, तो म्हणजे पुढे काय होणार? । Arvind Kejriwal ED Arrest
केजरीवाल यांना जामीन मिळणार का? केजरीवाल आता जामीन मिळवण्यासाठी काय प्रयत्न करू शकतात. त्यांचे सगळे मार्ग बंद झाले आहेत की त्यांच्यापुढे काही पर्याय आहेत? या प्रश्नांची उत्तरे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत…. । Arvind Kejriwal ED Arrest
१. सहा दिवसांच्या कोठडीनंतर जर ईडीला वाटले की केजरीवाल यांच्या अधिक कोठडीची त्यांना आवश्यकता आहे तर ते न्यायालयाकडे तशी मागणी करू शकतात.
२. चौकशीच्या दरम्यान जर आरोपी (म्हणजे केजरीवाल) कोणा अन्य व्यक्तीची माहिती देत असेल तर आणि ती व्यक्तीही या प्रकरणात सामील असेल तर तर न्यायालय कोठडीची मागणी पूर्ण करू शकते. तथापि, १४ दिवसांपेक्षा अधिक काळ कोठडी देण्याची या कायद्यात तरतुद नाही.
३. ईडीची १४ दिवसांची कोठडी संपल्यानंतर केजरीवाल यांना १४ दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत पाठवले जाउ शकते.
४. १४ दिवसांच्या न्यायालयीन कोठडीची तरतुद अशासाठी आहे की त्या १४ दिवसांनंतर आरोपी त्याला तुरूंगात कोणतीही अडचण नसल्याचे न्यायालयाला सांगू शकेल.जर आरोपीची काही तक्रार असेल तर न्यायालयत तुरूंग प्रशासनाला त्यासंदर्भात आदेश देऊ शकते.
५. अरविंद केजरीवाल यांना आता सहा दिवसांची कोठडी देण्यात आली असल्यामुळे ते आता पुन्हा कोणती याचिका दाखल करू शकत नाहीत. आणि यात जामीनासाठीच्या याचिकेचाही समावेश आहे. अर्थात या काळात केजरीवाल यांची कोणती दुर्घटना घडली अथवा कुटुंबात काही अडचण अथवा आणीबाणीची स्थिती उदभवली तर ते जामीनासाठी अर्ज करू शकतात.
जामीन कसा मिळणार?
१. ईडीच्या कोठडीची मुदत संपल्यावर केजरीवाल जामीनासाठी अजे करू शकतात. त्या स्थितीत न्यायाधीश आपल्या विवेक बुध्दीने याचा निर्णय घेतील.
२. चौकशीच्या दरम्यान तपास संस्थेला सगळी माहिती दिली गेली आहे या आधारावर केजरीवाल यांचे वकील जामीन मागू शकतात.
३. तर आरोपी एक प्रभावशाली व्यक्ती आहे. तो तपासात अडथळे आणू शकतो. पुरावे नष्ट करण्याचा अथवा अन्य प्रकारचा प्रभाव टाकू शकतो अशी मांडणी करत तपास संस्थेकडून जामीनाला विरोध केला जाऊ शकतो. अशा स्थितीत जामीन याचिका फेटाळली जाउ शकते. मनिष सिसोदिया, संजय सिंह आणि के. कविता यांच्याबाबत तसेच करण्यात आले आहे.
४. ईडीच्या कोठडीनंतर न्यायालयीन कोठडीत पाठवण्याची तरतुद आहे. त्यानंतरच आरोपी जामीनासाठी अर्ज करू शकतो. तपास संस्थेच्या कोठडीत असताना जामीन अर्जावर सुनावणी घेतली जात नाही. मात्र न्यायालयीन कोठडीत असल्यावरच ती घेतली जाउ शकते.