कराची – कराचीमध्ये रेशन दुकानात धान्याचे पीठ वाटपाच्यावेळी झालेल्या चेंगराचेंगरीमध्ये 12 जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये 9 महिलींचा समावेश आहे. धान्याचे पीठ वाटपाच्यावेळी यापूर्वी झालेल्या अशाच घटनांमध्ये किमान 14 जणांचा मृत्यू झाला होता. मात्र एकाच दिवसात 12 जणांचा चेंगराचेंगरीमध्ये मृत्यू होण्याची ही पहिलीच वेळ आहे.
कराचीतील नौरोस चौकातील एका फॅक्टरीमध्ये हे धान्य पीठ वितरण करण्यात येत होते. गर्दीमध्ये चेंगरून तीन लहान मुलांचाही मृत्यू झाला आहे.
या फॅक्टरीमध्ये पेट्रोलची गळती झाल्यामुळे आग देखील लागली होती. ही आग विझवण्यासाठी फॅक्टरीतील कर्मचाऱ्यांनी पाण्याचा मारा केला होता, असे घटनास्थळावर साचलेल्या पाण्यावरून ल7ात येते. या आगीमुळे नागरिकांमध्ये प्रचंड धावपळ उडाली असावा आणि त्यातून ही चेंगराचेंगरी झाली असावी, असा पोलिसांचा अंदाज आहे.
रमझान महिन्याच्या निमित्ताने गरिबांना झकात किंवा धान्य वाटप करण्यात येते. मात्र अशाप्रकारे झकात वाटप केले जाणार असल्याचे पोलिसांना कळवण्यात आले नव्हते, असेही पोलिसांनी सांगितले.