आयपीएच्या 16 व्या हंगामाला दणक्यात सुरुवात झाली आहे. शुक्रवारी गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपरकिंग्ज यांच्यात सामना पार पडला. अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये हा सामना पार पडला. पहिल्या सामन्यात गुजरात टायटन्सने चेन्नईचा पराभव करत विजयी सुरुवात केली आहे.
आयपीएलच्या माध्यमातून बीसीसीआय करोडोंची उलाढाल करत असतं. या आयपीएलच्या माध्यमातून अनेक खेळाडू लखपती, करोडपतीही झाले आहेत. त्यामुळे संपूर्ण जगाचं लक्ष लागलेल्या आयपीएलमध्ये अनेक देशांचे खेळाडू सहभाग होत असतात. दरम्यान, पाकच्या खेळाडूंना यंदाच्या वर्षातही आयपीएलमध्ये खेळण्याची संधी न मिळाल्यामुळे पाकिस्तानी क्रिकेट संघाचे माजी कर्णधार आणि पंतप्रधान इम्रान खान यांनी नाराजी व्यक्त करताना भारतीय क्रिकेट नियामक मंडळावर(BCCI) जोरदार टीका केली आहे.
“BCCI (भारतीय क्रिकेट बोर्ड) पाकिस्तानी खेळाडूंवर राग (आयपीएलमध्ये खेळण्याची परवानगी न देत) काढत असल्याचं मला आश्चर्य वाटत आहे. हा एक अहंकाराचा भाग आहे,” असं इम्रान खान यांनी एका रेडिओ वाहिनीशी बोलताना म्हटलं आहे. “जर भारत पाकिस्तानी खेळाडूंना आयपीएलमध्ये खेळण्यापासून रोखत असेल तर पाकिस्तानने चिंता करण्याची गरज नाही,” असा सल्लाही इम्रान खान यांनी दिला आहे.
एका रेडिओ वाहिनीशी बोलताना इम्रान म्हणाले,” BCCI ला भरपूर पैसा मिळत असल्याने आता BCCI ‘अहंकारी’ झाले आहे. ते म्हणाले- पाकिस्तान आणि भारताचे संबंध दुर्दैवी आहेत. क्रिकेट जगतातील महासत्ता म्हणून भारत आता ज्या पद्धतीने वावरतो आहे, त्यात कमालीचा अहंकार आहे. इतर कोणत्याही देशापेक्षा खूप जास्त पैसे कमवण्याच्या त्यांच्या क्षमतेमुळे, मला वाटते की भारत क्रिकेटच्या क्षेत्रात महाशक्ती बनला आहे. त्यामुळे कोणी खेळायचे आणि कोणी नाही हे ठरवत आहेत.
ICC ODI World Cup 2023 : “विश्वकरंडक स्पर्धेतील पाकिस्तानचे…” ICC कडून सर्व अफवांना पूर्णविराम
दरम्यान, 2008 मध्ये पाकिस्तानी खेळाडू आयपीएलच्या पहिल्या आवृत्तीचा भाग होते, परंतु त्याच वर्षाच्या उत्तरार्धात मुंबईत झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे दोन्ही देशांमधील राजकीय तणाव वाढला. यामुळे अखेरीस या स्पर्धेत पाकिस्तानी खेळाडूंच्या सहभागावर बंदी घालण्यात आली. तेव्हापासून आतापर्यंत पाकिस्तान आणि त्याचे माजी क्रिकेटपटू या प्रकरणावर नाराज आहेत. पाकिस्तानने नवीन टी-20 लीग सुरू केली आहे, पण आयपीएलइतके नाव कमावता आले नाही. अशा परिस्थितीत आजही पाकिस्तानचे माजी क्रिकेटपटू आयपीएलबाबत बेताल वक्तव्ये करण्यात कमी पडत नाहीत.