भोपाळ, – स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सात दशकांनंतरही पाकिस्तानचे नागरिक नाखुश आहेत. भारताची फाळणी ही एक चूक होती असे त्यांना आता वाटते आहे, अशी प्रतिक्रिया राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी दिली. (RSS Chief Mohan Bhagwat Says People In Pakistan Unhappy, Believe Partition Was Mistake) क्रांतीकारक हेमू कलाणी यांच्या जयंतीनिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात भागवत बोलत होते.
देशातील विविध भागांतील सिंधी समुदायातील नागरिक यावेळी उपस्थित होते. अखंड भारत सत्य आहे आणि खंडित भारत एक दु:स्वप्न आहे, असे मतही भागवत यांनी यावेळी व्यक्त केले.
#IPL2023 : “BCCI अहंकारी, पाकिस्तानी खेळाडूंना आयपीएलमध्ये…”, पाकचे माजी PM बरसले
ते म्हणाले की, भारतापासून वेगळे होऊन सात दशके झाली तरी अजूनही पाकिस्तान दु:खी आहे. मात्र भारतात सुख नांदते आहे. भारत खंडित झाला आहे. आपल्याला नवा भारत निर्माण करायचा आहे. ज्याला आपण आज पाकिस्तान म्हणतो तेथील लोक आपली चूक झाली असे मानतात. आपल्या हट्टीपणामुळे ते भारतापासून वेगळे झाले. भारतीय संस्कृतीपासून वेगळे झाले. आता ते सुखात आहेत का? जे योग्य आहे तेच टिकते. जे अयोग्य आहे ते येते तसे चाललेही जाते.
Maharashtra Politics : उदय सामंत भरत गोगावलेंसह शरद पवारांच्या भेटीला…
फाळणीच्या वेळी सिंधी समाजाने सगळे काही गमावले तरी हा समुदाय शरणार्थी झाला नाही. त्यांनी आपला पुरुषार्थ सिद्ध केला. देशाच्या स्वातंत्र्याच्या आंदोलनातही सिंधी समुदायाचे नाव जोडले गेले आहे. त्यांचे त्यात मोठे योगदान होते. त्याचा उल्लेख मात्र फारसा होत नाही. या समुदायाने भारत सोडला नाही. ते भारतातून भारतातच आले होते.