मुंबई – राष्ट्रपती निवडणुकीत एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा देण्यात यावा, अशी भूमिका शिवसेनेच्या आणखी एका खासदाराने घेतली आहे. त्यामुळे त्या निवडणुकीबाबत निर्णय घेण्यावरून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावरील दबाव आणखी वाढणार आहे.
शिवसेनेचे मुंबईतील खासदार राहुल शेवाळे यांनी काही दिवसांपूर्वी उद्धव ठाकरे यांना एक पत्र पाठवले. त्यामध्ये मुर्मू यांना पाठिंबा देण्याची मागणी करण्यात आली. आता तशीच मागणी करणारे पत्र पालघरचे खासदार राजेंद्र गावित यांनी उद्धव ठाकरे यांना पाठवले आहे. गावित स्वत: आदिवासी समाजातील आहेत. शिवसेनेने अद्याप राष्ट्रपती निवडणुकीत कुणाला पाठिंबा द्यायचा याविषयीचा निर्णय जाहीर केलेला नाही.
शिवसेनेचे मित्रपक्ष असणाऱ्या कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेसबरोबरच इतर विरोधी पक्षांनी संयुक्त उमेदवार म्हणून माजी केंद्रीय मंत्री यशवंत सिन्हा यांना रिंगणात उतरवले आहे. त्यामुळे शिवसेना सिन्हा यांनाच पाठिंबा देईल असे मानले जात होते.
हायकमांडच्या चौकशीच्या आदेशावर अशोक चव्हाणांची स्पष्ट शब्दात नाराजी; म्हणाले…
मात्र, त्या पक्षाच्या दोन खासदारांनी आतापर्यंत आदिवासी समाजाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या मुर्मू यांना अनुकूलता दर्शवली आहे. त्या भूमिकेकडे उद्धव यांना दुर्लक्ष करून चालणार नाही, अशी सध्याची स्थिती आहे. त्याचे कारण म्हणजे शिवसेनेचे काही खासदार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील बंडखोर गटाच्या संपर्कात असल्याचे वृत्त आहे.
“महाराष्ट्रात मध्यावधी निवडणुका घेऊन दाखवा”