नगर – जुलै ते डिसेंबर 2020 मध्ये राज्यातील 12655 तर नगर जिल्ह्यातील 765 ग्रामपंचायतींची मुदत संपत आहे.राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार प्रभाग रचना,आरक्षण व आरक्षणाच्या कार्यवाहीस तात्काळ प्रारंभ करण्यात आला आहे.
कारण आयोगाच्या नियमानुसार सहा महिन्याअगोदर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांच्या प्रभाग पध्दतीत कोणताही बदल करता येत नाही. त्यामुळे तातडीने हा प्रभाग रचना कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. प्रभाग रचनेत गुगल मॅपवर तयार करण्यात आलेल्या नकाशावरून गावचे अंतिम नकाशे तयार करणे, नकाशावर प्रचलित पध्दतीने प्रभाग पाडणे,सदर प्रभाग रचना तातडीने जिल्हाधिकारी कार्यालयास सादर करावे, जिल्हाधिकारी कार्यालयातील तपासणीनुसार तहसीलदार यांच्या अध्यक्षतेखालील समितीने आरक्षणासह वरील प्रारूप प्रभाग रचनेला मान्यता देणे आदी बाबी तातडीने सुरु करण्याचे आदेश राज्य निवडणूक आयोगाने दिले आहेत. 20 डिसेंबर ते 21 मार्च पर्यंत हा प्रभाग रचना व आरक्षण कार्यक्रम कार्यवाही होईल.