मुंबई – येत्या 3 नोव्हेंबरला अंधेरी (पूर्व) विधानसभेची पोटनिवडणुक होत आहे. येथे 2019 च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे रमेश लटके विजय झाले होते. त्यांच्या अकाली निधनानंतर पोटनिवडणुक होत आहे. शिवसेना उद्धव ठाकरे गट आणि भाजप यांच्यात ही मुख्य लढत होणार आहे. भाजपकडून मुरजी पटेल यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला असून शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून कै. रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे. दोन्ही पक्षांनी प्रचार सुरु केला असून आमचाच विजय होईल असे दोन्ही पक्षाकडून सांगण्यात येत आहे.
“मला वाटलं होतं ही निवडणुक बिनविरोध होईल, पण भाजप…” – ऋतुजा लटकेंची भावनिक प्रतिक्रिया https://t.co/b0gdNzvVaf
— Digital Prabhat (@Dainik_Prabhat) October 16, 2022
राजकीय वर्तुळातील सध्याच्या चर्चा पाहता भाजपला ही निवडणूक जड जाईल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्याची मुख्य तीन कारणे सध्या सर्वांच्या चर्चेचा विषय ठरली आहेत. पहिले कारण म्हणजे, महाराष्ट्राची राजकीय संस्कृती… राज्याच्या राजकारणातील पोटनिवडणुकांचा मागिल इतिहास पाहिला असता, अनेकदा एखाद्या आमदाराचे, खासदाराचे अकाली निधन झाल्यास आणि पोटनिवडणुकीत त्याच्या घरातील सदस्य उभा असल्यास निवडणुक बिनविरोध करण्यात येते. दरम्यान, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही पत्र लिहून ही निवडणूक बिनविरोध करण्याची विनंती राज्याचे उपमुख्यमंत्री आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. त्यामुळे लटके यांच्या बाजूने जनतेत सहानुभूती आहे.
Andheri By-Election: शिवसेना ठाकरे गटाचे भास्कर जाधवांनी ‘त्या’ पत्रामुळे मानले राज ठाकरेंचे आभार https://t.co/FOTS1WbDV1
— Digital Prabhat (@Dainik_Prabhat) October 16, 2022
दुसरे कारण म्हणजे मुरजी पटेल गुजराती असल्याच्या चर्चा आहे. मुरजी पटेल हे मुळचे गुजरातमधील आहेत. ते लहानपणापासून मुंबईतील अंधेरी मरोळ येथे राहतात. नुकतेच काही दिवसांपूर्वी राज्यात होणारा वेदांत-फाॅक्सकाॅन प्रकल्प भाजपमुळे गुजरातला गेल्याचा आरोप महाविकास आघाडी सरकारकडून तसेच प्रामुख्याने शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून करण्यात आला होता. भाजप लाखो तरूणांना मिळणारा रोजगार हिरावला असल्याचा आरोप करण्यात आला होता. त्यामुळे राज्यभरात भाजप सरकारविरोधात संतापाची लाट उसळली होती. ते प्रकरण ताजे असतानाच आता भाजपने पोटनिवडणुकीत मुळ गुजरातचा असलेला उमेदवार दिल्याने भाजपला मोठा फटका बसू शकतो.
Andheri By-Election: मुरजी पटेलांचं आमदार होण्याचं स्वप्न अधुरं राहणार? फडणवीसांनी राज ठाकरेंच्या पत्रावर दिली “ही’ प्रतिक्रिया https://t.co/xqR3iWelgz
— Digital Prabhat (@Dainik_Prabhat) October 16, 2022
तिसरे कारण म्हणजे, अंधेरी 2014पासून शिवसेनेच्या ताब्यात आहे. 2014मध्ये भाजपचे लल्लनसिंह यादव आणि शिवसेनेचे रमेश लटके यांच्या मुख्य लढत झाली होती. यावेळी लटके यांना विजय मिळाला होता. त्यानंतर 2019 च्या निवडणुकीतही रमेश लटके यांनाच विजय मिळाला होता. त्यावेळीही मुरजी पटेल यांनी अपक्ष म्हणून निवडणुक लढवली होती मात्र त्यांनी पराजय पत्करावा लागला होता. त्यानंतर आता भाजपने मुरजी यांना उमेदवारी दिली आहे. मात्र सलग 10 वर्षे त्या ठिकाणी लटके आमदार असल्यामुळे तेथील जनता लटके यांनाच विजयी करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तशा प्रकारच्या चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरु आहेत.