मुंबई – अभिनेत्री कंगना रणौतने मुंबईला पाकव्याप्त काश्मीर संबोधल्याने तिच्यावर चौफेर टीका करण्यात येत आहे. अनेकांनी कंगनाच्या वक्तव्याची तीव्र शब्दांमध्ये निंदा केली असून तिला खडे बोल सुनावले आहेत. शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यासोबत रंगलेल्या ट्विटर वॉर दरम्यान कंगनाने मुंबईबाबतचे आक्षेपार्ह वक्तव्य केलं होत.
He turns out to be more Naughty than what we thought ! #Naughty Naughty 😁
— AMRUTA FADNAVIS (@fadnavis_amruta) September 7, 2020
दरम्यान, खासदार संजय राऊत यांनी त्यांनी कंगनाला उद्देशून वापरलेल्या ‘हरामखोर’ शब्दाचा अर्थ उलगडून सांगितला आहे. एका हिंदी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये त्यांनी, ‘हरामखोर म्हणजे मराठी भाषेत बेईमान, ती नॉटी म्हणजे खट्याळ मुलगी आहे आणि बेईमान आहे. असं मला वाटतं’ अशी भूमिका मांडली.
या वक्तव्यावरून माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी संजय राऊत यांचं नाव न घेता ट्विट करत टीका केली आहे. “आम्ही विचार केला त्यापेक्षाही जास्त नॉटी आहेत,” असं म्हणत अमृता फडणवीस यांनी संजय राऊत यांचं नाव न खोचक टीका केली आहे. तत्पूर्वी ही अमृता फडणवीस यांनी शिवसेनेच्या जोडे मारो आंदोलनावरून टीका केली होती.