मुंबई – महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी अनिक्षा जयसिंघानी नावाच्या एका डिझायनरच्या विरोधात तक्रार दाखल केला आहे. तिला अटकही करण्यात आली आहे. अमृता फडणवीस मागच्या दीड वर्षापेक्षा जास्त काळ अमृता फडणवीस या अनिक्षाला ओळखतात. अमृता फडणवीस यांच्या घरीही अनिक्षा गेली होती.अनिक्षा ही सट्टेबाज अनिल जयसिंघानीची मुलगी आहे. तसेच तिचा भाऊ अक्षय जयसिंघानीलाही ताब्यात घेण्यात आले आहे.
यावर आता विरोधी पक्षाकडून प्रश्न उपस्थित केले जात आहे. अशातच “भ्रष्ट मार्गाने सत्तेवर आलेल्या सरकारने तत्त्व आणि नीतिमत्तेच्या फालतू वल्गना करू नयेत हेच बरे. अन्यथा तुमचेच वस्त्रहरण होईल. अमृता फडणवीस या शुद्ध आणि पवित्र आहेत. त्यांचे बोलणे हा त्यांच्या व्यक्तिगत स्वातंत्र्याचा विषय आहे, पण 1 कोटी रुपयांची लाच देण्याचा प्रयत्न करणारे तुमच्या स्वयंपाक घरापर्यंत पोहोचले कसे? असा सवाल ‘सामना’तून फडणवीसांना विचारण्यात आला आहे.
कायद्याचे राज्य साफ कोसळले आहे. ते असेच कोसळत राहिले तर महाराष्ट्र कोसळेल व महाराष्ट्राच्या प्रतिमेस तडेच तडे जातील. त्यास सुरुवात झाली आहे. या राज्यात सर्वकाही पैशानेच साध्य होते व ‘लाच’ हाच परवलीचा शब्द झाला आहे. ‘लाच’ देणे व घेणे यात गैर वाटत नाही अशी महाराष्ट्राची प्रतिमा झाली आहे. व त्यामुळेच हे राज्य भविष्यात संतसज्जनांचे राहील काय, असा प्रश्न पडतो. गौतम अदानी यांच्या भ्रष्टाचारावर दरोडेखोरीवर महाराष्ट्राचे सरकार गप्प आहे, असे अग्रलेखात म्हटलं आहे.