मुंबई – महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी महाराष्ट्र विधानसभेच्या सचिवांना गुरुवारी सकाळी ११ वाजता उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकारची फ्लोअर टेस्ट घेण्यास सांगितले आहे. यावरून आता भाजप नेत्यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. भाजप नेते अतुल भातखळकर यांनी एक सूचक ट्विट केले आहे की,’आता फक्त 48 तास…’ असं लिहत भाजप नेत्यांवर निशाणा साधला आहे.
आता फक्त ४८ तास…
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) June 29, 2022
याच्यावर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी सूचक शब्दांत केलेल्या ट्वीटमुळे चर्चांना उधाण आलं आहे. अमोल मिटकरी म्हणाले,’अति उतावीळ वऱ्हाडाला पाहुणचार म्हणुन दगड गोटे मिळाल्याची घटना महाराष्ट्रात ताजी आहे .सरकार स्थापनेचा उतावीळपणा करत “48” तासाचा अल्टीमेटम देणाऱ्या उतावीळ नवऱ्यांनो ,अजून बरच काही बाकी आहे.’असं म्हणत खोचक टीका केली आहे.
अमोल मिटकरी यांचे ट्विट
अति उतावीळ वऱ्हाडाला पाहुणचार म्हणुन दगड गोटे मिळाल्याची घटना महाराष्ट्रात ताजी आहे .सरकार स्थापनेचा उतावीळपणा करत “48” तासाचा अल्टीमेटम देणाऱ्या उतावीळ नवऱ्यांनो ,अजून बरच काही बाकी आहे.
— आ. अमोल रामकृष्ण मिटकरी (@amolmitkari22) June 29, 2022