खेड-शिवापूर -कामगार हा समाजातील महत्त्वाचा घटक असून आपल्या न्याय हक्कासाठी सर्व क्षेत्रातील कामगारांनी एकत्र येण्याची आवश्यकता आहे, असे मत माजी केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केले.
कोंढणपूर फाटा (ता.हवेली) येथे रविवारी (दि. 22) रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या कामगार आघाडीच्यावतीने कामगार महामेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कामगारांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
आरपीआयचे पुणे जिल्हाध्यक्ष सूर्यकांत वाघमारे, परशुराम वाडेकर, प्रदीप कांबळे, राहुल कांबळे, गुणवंत नागटीळे, अनिल मोरे, प्रदीप गंगावणे, अमित कडाळे, संदेश साळवे, दादासाहेब शेलार, नितीन माने, योगेश बोकेफोडे, संतोष गायकवाड, विनोद वाघमारे, अनिल सकपाळ, प्रवीण ओव्हाळ, राजेंद्र कोंडे, सुनील गायकवाड, प्रवीण कांबळे, राजेश तिरमारे, प्रदीप म्हस्के, अनिल गंगावणे यावेळी उपस्थित होते.
याप्रसंगी कामगार आघाडीचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष प्रदीप कांबळे, परशुराम वाडेकर, सूर्यकांत वाघमारे आदींनी मनोगत व्यक्त केले.