पुणे – जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर शालेय सहल घेऊन जाणाऱ्या एसटी बसचा भीषण अपघात झाला आहे. यामध्ये 15 विद्यार्थी आणि तीन शिक्षक जखमी झाले आहेत.
खताळ महाविद्यालयातून या विद्यार्थ्यांची अलिबागला सहल गेली होती. सहलीहून परत संगमनेरला जात असताना हा अपघात झाला. मुंबई-पुणे महामार्गावर मधोमध बंद पडलेल्या उसाच्या ट्रॉलीला भरधाव एसटी बसने जोरदार धडक दिली. या दुर्घटनेनंतर उस मोठ्या महामार्गावर आल्या तर एसटीही बंद पडल्यानं काही काळासाठी वाहतूक ठप्प झाली होती. सध्या पर्यायी मार्ग म्हणून मुंबईकडे जाणाऱ्या एक लेनवरून विरुद्ध दिशेने वाहतूक वळविण्यात आली आहे.
दरम्यान अशा पद्धतीनं ट्रॉली महामार्गावर बंद पडली असल्याची पूर्व कल्पना कोणालाही देण्यात आली नव्हती का असा सवाल उपस्थित केला जात आहे. मुंबई-पुणे महामार्गावर सतत होणाऱ्या अपघातांमुळे धोकायदायक बनत चालला आहे. बसमध्ये एकूण 44 विद्यार्थी असल्याची माहिती मिळत आहे. त्यापैकी 15 विद्यार्थी आणि तीन शिक्षक गंभीर जखमी झाले आहेत. या अपघातातील जखमींवर पवना रुग्णालयात उपचार सुरू आहेत.