नवी दिल्ली – रेल्वे मंत्रालयाने देशातील 866 रेल्वे स्थानकांवर सीसीटीव्ही यंत्रणा बसवली आहे, असे केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी बुधवारी लोकसभेत सांगितले.ते म्हणाले की, सीमावर्ती भागांजवळ असलेल्या रेल्वे स्थानकांवर विशेष रेल्वे संरक्षण दल तैनातीसह विशेष व्यवस्था करण्यात येत आहे. भारतीय रेल्वे प्रवाशांची सुरक्षा आणि सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी सर्व उपाययोजना केली जात आहे असे त्यांनी नमूद केले.
सीसीटीव्ही यंत्रणेमुळे मुलांची सुटका, महिला प्रवाशांचे संरक्षण आणि वृद्धांना मदत करण्याच्या बाबतीत सकारात्मक परिणाम झाला आहे, असे मंत्री म्हणाले. इंटरनेट प्रोटोकॉल (आयपी) आधारित सीसीटीव्ही प्रणालींबाबत सायबर सुरक्षा महत्त्वाची आहे यावर भर दिला जात आहे असेही त्यांनी यावेळी नमूद केले. या खेरीज प्रवाशांच्या सुरक्षेसाठी आवश्यक ती सर्व उपाययोजना आम्हीं करू असे ते म्हणाले.