Railway Rule change : 2023 हे वर्ष संपत असून नवीन वर्षाची चाहूल सर्वाना लागली आहे. त्यातच 2023 मध्ये अनेक गोष्टी घडल्या ज्या सर्वसामान्यांसाठी फायदेशीर होत्या तर दुसरीकडे नागरिकांना काही गोष्टींमुळे चांगलाच फटका बसला आहे. भारतातील प्रत्येक विभागाप्रमाणेच रेल्वेनेही या वर्षभरात अनेक बदल केले. या बदलांमुळे सामान्य माणसाला फायदा झाला की तोटा? हेच आपण जाणून घेऊया…
जनरल तिकिटाची सुविधा
साधारणपणे, जनरल तिकीट खरेदी करण्यासाठी रेल्वे बुकिंग काउंटरवर मोठी गर्दी असायची. पण आता हे क्वचितच पाहायला मिळत आहे. कारण यंदा भारतीय रेल्वेच्या जनरल तिकिटाची सुविधाही ऑनलाइन करण्यात आली. भारतीय रेल्वेने UTS नावाचे अॅप तयार केले आहे. या अॅपद्वारे, जनरल तिकिटाने प्रवास करणारे प्रवासी रांगेत उभे न राहता ऑनलाइन तिकीट बुक करू शकतात. यासोबतच भारतीय रेल्वेने स्थानकांवर तिकीट यंत्रेही बसवली आहेत. रेल्वेच्या या निर्णयाने जनरल तिकिटांवर प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठा फायदा झाला आहे. यासोबतच बुकिंग काउंटरवरील गर्दीही कमी झाली आहे.
वेटिंग लिस्ट संपणार
भारतात दरवर्षी अंदाजे 700 कोटी प्रवासी रेल्वेने प्रवास करतात. त्यामुळे 2030 पर्यंत हा आकडा 1000 कोटींवर पोहोचण्याचा अंदाज आहे. आता कुठे जायचं असेल आणि आधी तिकीट काढता आलं नसेल तर असं सर्वसाधारणपणे पाहायला मिळतं. त्यात तुम्ही तत्काळद्वारे तिकीट बुक केल्यास, तुम्हाला अनेकदा प्रतीक्षा यादी (वेटिंग लिस्ट) पाहायला मिळते. याला सामोरे जाण्यासाठी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी योजना आखली आहे. प्रवाशांना वेटिंगच्या गैरसोयीपासून वाचता यावे यासाठी त्यांनी आणखी गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे.
TTE तुम्हाला त्रास देणार नाही
तुम्ही ट्रेनने प्रवास करता तेव्हा, TTE तुमचे तिकीट तपासण्यासाठी येतो. जर एखादी व्यक्ती विना तिकीट प्रवास करत असेल तर ते त्याच्यावर दंड आकारतात. पण कधी कधी रात्रीच्या वेळीही प्रवासी ट्रेनमध्ये झोपलेले असतात. तरीही टीटीई जाऊन तिकिटे तपासतात. त्यामुळे इतर प्रवाशांची गैरसोय होते. यासाठी रेल्वेने आता नवा नियम केला आहे की टीटीई रात्री १० वाजल्यानंतर तिकीट तपासू शकणार नाहीत. त्यानुसार TTE च्या त्रासापासून तुम्हाला सुटका मिळाली आहे.